शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पीकविमा कंपनी प्रशासनास जुमानेना; ११ मंडळांना अग्रीम देण्यास टाळाटाळ!

By हरी मोकाशे | Updated: November 27, 2023 21:30 IST

२ लाख १९ हजार शेतकऱ्यांना भरपाई...

लातूर : दीपावलीपूर्वी विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील ४३ महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान, पीकविमा कंपनी आता ३२ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. ११ मंडळांना अग्रीम देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे पीकविमा कंपनी प्रशासनास जुमानत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

खरिपात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने खरिपातील सोयाबीन उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे ६० महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारकांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने आक्षेप घेतल्याने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समितीची बैठक झाली.

बैठकीत पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीने ६० पैकी ४३ महसूल मंडळांना अग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले, तर उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करून सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. आता पीकविमा कंपनीने ४३ पैकी केवळ ३२ मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम जमा करण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित ११ मंडळांना आगाऊ रकमेसाठी टाळाटाळ सुरू केली आहे.

२ लाख १९ हजार शेतकऱ्यांना भरपाई...पीकविमा कंपनीने ३२ महसूल मंडळांतील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २१५ कोटी जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यात तांदुळजा, हरंगुळ बु., कन्हेरी, मुरूड, गातेगाव, कासारखेडा, चिंचोली ब., बाभळगाव, लातूर, भुतमुगळी, मदनसुरी, पानचिंचोली, कासार बालकुंदा, निलंगा, निटूर, हिसामाबाद, बेलकुंड, किनीथोट, उजनी, औसा, भादा, लामजना, तोंडार, उदगीर, झरी, चाकूर, आष्टा, वडवळ ना., नळेगाव, शेळगाव, कारेपूर, घोणसी मंडळाचा समावेश आहे.

ही अकरा मंडळे वंचित...कासार शिरसी, औराद शहाजानी, साकोळ, किल्लारी, नागलगाव, नळगीर, रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, जळकोट आणि शिरूर ताजबंद ही अकरा महसूल मंडळे अग्रीमपासून वंचित राहत आहेत.

काहींना दिलासा, तर काहींना प्रतीक्षा...जिल्ह्यातील ३२ महसूल मंडळांतील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे अग्रीम कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रभारी कारभारामुळे उदासीनता...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा कारभार हा प्रभारींवरच सुरू आहे. त्यामुळे उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. नियमित अधिकारी येतील आणि हा तिढा सोडवतील अशी प्रभारींची मानसिकता असल्याची चर्चा होत आहे. त्याचा परिणाम मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होत आहे. हे प्रभारी कोणाचे 'लाडके'? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :laturलातूर