शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

चारित्र्यसंपन्न पिढीकडून राष्ट्राची उभारणी, डॉ. एस. एन. सुब्बाराव यांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:43 IST

केवळ भौतिक साधनसामुग्री म्हणजे राष्ट्राचा विकास नाही. बुलेट ट्रेन ही काळाची गरज असली, तरी भूक, भ्रष्टाचार, नशा आणि हिंसा संपविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

लातूर : केवळ भौतिक साधनसामुग्री म्हणजे राष्ट्राचा विकास नाही. बुलेट ट्रेन ही काळाची गरज असली, तरी भूक, भ्रष्टाचार, नशा आणि हिंसा संपविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. चारित्र्य आणि शारीरिक विकासावरच राष्ट्राची उभारणी होईल, असे मत राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांनी येथे व्यक्त केले.विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि राष्ट्रीय युवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने १९ वा राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव गोल्डक्रेस्ट हायच्या प्रांगणात सुरू आहे. याप्रसंगी ते लोकमतशी बोलत होते. देशातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती, राहणीमानातील विविधता आणि विधितेतून राष्ट्राची एकता हा या बालमहोत्सवाचा उद्देश आहे असे सांगत डॉ.एस.एन. सुब्बाराव म्हणाले, केवळ बोलून एकतेचा उद्देश साध्य होणार नाही. त्यासाठी कृती करावी लागणार आहे.यावेळी बोलताना ते पूढे म्हणाले. देशातल्या विविधेतून एकता साध्य करायची असेल तर सरकारच्या प्रतिनिधींनी लातुरातील हा बालमहोत्सव पाहिला पाहिजे. केरळ राज्यामध्ये श्रम करताना दिल्लीतील शास्त्री भवनातून टेलिफोन आला, मिश्रा नामक व्यक्तीने सांगितले की तुमचे नाव पद्म अ‍ॅवॉर्डसाठी घेण्यात आले आहे. त्यावेळी मी त्यांना पद्म अ‍ॅवॉर्ड नको असे सांगितले.त्यानंतर तामिळनाडूचे मंत्री एम.जी. रामचंद्रजी यांचे नाव पुरस्कारासाठी पुढे आले. सिनेमावाल्यांना असे अ‍ॅवॉर्ड दिले जात असेल तर त्यांच्या रांगेत मला थांबायचे नाही असे ठणकावून सांगितले. हे बालक माझे पद्म अ‍ॅवॉर्डच आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्रव्यवहार केला, त्यावेळी मंत्री महावीर त्यागी आणि डॉ.व्ही.के.आरव्ही राव यांनी एनएसएस व एनसीसीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आणि पहिला महोत्सव सेवाग्राम येथे झाला. एनएसएसमध्ये सक्तीची सेवा नाही तिथे स्वयंअनुशासन आहे. तर एनसीसीमध्ये सक्तीने अनुशासन केले जाते आणि आमच्या बाल महोत्सवातही स्वयंअनुशासन आहे. विविधतेतून एकता साध्य करण्याचा बाल महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. एकतेची शिस्त या बाल महोत्सवात मिळते, असेही सुब्बाराव म्हणाले.जय जगत् पुकारे जा..सुब्बाराव म्हणाले, भारतासह जगातील २५ देशांमध्ये भ्रमण केले. यूनोमध्ये शांतता या विषयावर व्याख्यान दिले. सहभागी झालेल्या जगभरातील १४०० तज्ज्ञांनी पुस्तकी ज्ञानावर भर दिला. पण आम्ही प्रत्यक्ष कृतीतील अनुभवावर तिथे व्याख्यान दिले आणि ते यूनोमधील सहभागी तज्ज्ञांना आवडले. याच कार्यक्रमात जय जगत्, जय जगत्.. पुकारे जा.. सिर अमन पे वारे जा.. सबके हितके वास्ते, अपने सूख बिसारे जा...ह्ण, ह्यप्रेम की पुकार हो, सबका सबसे प्यार हो.. जीत हो जहानकी, क्यों किसीकी हार हो.. हा विश्वव्यापी विचार दिला आणि तो जगाला भावला, असेही डॉ.एस.एन. सुब्बाराव म्हणाले.