शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

बँकांच्या उदासीनतेमुळे महामंडळाचे कर्ज प्रस्ताव रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST

लातूर : मराठा समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज ...

लातूर : मराठा समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना राबविल्या जातात. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ५१ जणांनी कर्जासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ६१४ जणांना कर्ज मिळाले असून, राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासीनतेमुळे १ हजार लाभार्थी कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे अर्जदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी व्याज परतावा योजना राबविली जाते. त्याअंतर्गत महामंडळाकडे ३ हजार ५१ तरुणांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी १ हजार ६१४ जणांना महामंडळाच्या वतीने पूर्वसंमती देण्यात आली आहे, तर ६१४ जणांना ४३ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यापैकी ४३९ लाभार्थ्यांना २ कोटी ४ लाख रुपयांचा व्याज परतावाही देण्यात आला आहे. दोन खासगी फायनान्स कंपन्यांनी महामंडळासोबत कर्जपुरवठा करण्यासाठी करार केला आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजार प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित आहेत. सदरील प्रस्ताव दाखल करणारे तरुण बँकाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. व्याज परतावा योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या कर्जाचे व्याज महामंडळाच्या वतीने भरले जाते. यासाठी बँकांना महामंडळाच्या वतीने हमी दिली जात आहे. मात्र, तरीही बँकांचे याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी, व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

४३९ जणांना मिळाला व्याज परतावा...

महामंडळांतर्गत आतापर्यंत केवळ ६१४ जणांना कर्ज मिळाले आहे. यापैकी ४३९ लाभार्थ्यांना २ कोटी ४ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. महामंडळाकडे लातूर जिल्ह्यातील ३ हजार ५१ जणांचे प्रस्ताव दाखल आहेत. १ हजार ६१४ जणांना महामंडळाच्या वतीने पूर्वसंमती देण्यात आली आहे. कर्ज प्रस्तावांना बँकांकडून कर्ज पुरवठा होत नसल्याने अर्जदारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

प्रलंबित प्रस्तावासाठी बँकांकडे पाठपुरावा...

महामंडळाने पूर्वसंमती दिलेल्या कर्ज प्रस्तावांना बँकांनी कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पूर्तता असल्यानेच महामंडळाने परवानगी दिलेली असते. त्यामुळे बँकांकडे प्रलंबित असलेल्या कर्ज प्रस्तावासाठी जिल्हा कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी सांगितले.