शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

जिल्ह्यात कोरोना आला अन्‌ डेंग्यू गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण आढळत होते. मात्र, कोरोना काळातील लाॅकडाऊनमध्ये ...

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण आढळत होते. मात्र, कोरोना काळातील लाॅकडाऊनमध्ये डेंग्यू रुग्ण आढळले नाहीत. पाणी टंचाईमुळे नागरिक पाण्याचा साठा करून ठेवत असत. त्यातून डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढायचे. मात्र, सुदैवाने २०२० मधील एप्रिल, मे, जूनमध्ये पाणीटंचाई जाणवली नाही. परिणामी, डेंग्यू रुग्ण घटले अन्‌ कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. दरवर्षी जिल्हा हिवताप कार्यालयाकडे ७० ते ८० जणांना डेंग्यू आजाराचे निदान झाल्याची नोंद होत असे; पण २०२० मध्ये केवळ दोघाजणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले असल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयातून सांगण्यात आले.

आरोग्य सेवकांकडून तपासणी आणि सर्वेक्षण

लोकसंख्येच्या प्रमाणात घरांचा सर्व्हे आणि नागरिकांची तपासणी केली जाते. दर पंधरा दिवसाला ही तपासणी होते. २०२० मध्ये एप्रिल, मे, जून महिन्यांमध्ये मागच्या रुग्णांचा आकडा लक्षात घेता खबरदारी घेण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ॲबेट देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसंख्येत घट आहे.

- डाॅ. आर. आर. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी

डेंग्यूची लक्षणे

तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोके तसेच डोळ्यांच्या पाठीमागील भाग दुखणे, मळमळ आणि उलटी होणे ही प्रारंभीची लक्षणे आहेत.

तीव्र स्वरूपाचा डेंग्यू असेल तर बेशुद्ध पडणे, शरीरातून रक्तस्राव होण्याचा त्रासही डेंग्यूमुळे होतो.

डेंग्यू होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी

पाणी टंचाईमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात साठे केले जातात. हे पाणीसाठे घट्ट झाकणे, कोरडा दिवस पाळणे, कोरडा दिवस पाळणे शक्य नसेल तर गरजेनुसार ॲबेटिंग करणे.

पाणीसाठ्यामुळेच डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. डासांची अळी तयार होऊ नये म्हणून पाणीसाठ्यामध्ये ॲबेटिंग करणे किंवा त्या हौदामध्ये गप्पी मासे सोडणे, या उपाययोजनाही जिल्हा हिवताप कार्यालयाकडून सुचविल्या जातात.

नाले वाहते करणे, कुंडी, टायर, नारळाचे टरफल यामध्ये पाणी साचून डासोत्पत्ती होते. ती होऊ न देणे आणि कोरडा दिवस पाळणे.