शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जिल्ह्यात कोरोना आला अन्‌ डेंग्यू गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण आढळत होते. मात्र, कोरोना काळातील लाॅकडाऊनमध्ये ...

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण आढळत होते. मात्र, कोरोना काळातील लाॅकडाऊनमध्ये डेंग्यू रुग्ण आढळले नाहीत. पाणी टंचाईमुळे नागरिक पाण्याचा साठा करून ठेवत असत. त्यातून डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढायचे. मात्र, सुदैवाने २०२० मधील एप्रिल, मे, जूनमध्ये पाणीटंचाई जाणवली नाही. परिणामी, डेंग्यू रुग्ण घटले अन्‌ कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. दरवर्षी जिल्हा हिवताप कार्यालयाकडे ७० ते ८० जणांना डेंग्यू आजाराचे निदान झाल्याची नोंद होत असे; पण २०२० मध्ये केवळ दोघाजणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले असल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयातून सांगण्यात आले.

आरोग्य सेवकांकडून तपासणी आणि सर्वेक्षण

लोकसंख्येच्या प्रमाणात घरांचा सर्व्हे आणि नागरिकांची तपासणी केली जाते. दर पंधरा दिवसाला ही तपासणी होते. २०२० मध्ये एप्रिल, मे, जून महिन्यांमध्ये मागच्या रुग्णांचा आकडा लक्षात घेता खबरदारी घेण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ॲबेट देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसंख्येत घट आहे.

- डाॅ. आर. आर. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी

डेंग्यूची लक्षणे

तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोके तसेच डोळ्यांच्या पाठीमागील भाग दुखणे, मळमळ आणि उलटी होणे ही प्रारंभीची लक्षणे आहेत.

तीव्र स्वरूपाचा डेंग्यू असेल तर बेशुद्ध पडणे, शरीरातून रक्तस्राव होण्याचा त्रासही डेंग्यूमुळे होतो.

डेंग्यू होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी

पाणी टंचाईमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात साठे केले जातात. हे पाणीसाठे घट्ट झाकणे, कोरडा दिवस पाळणे, कोरडा दिवस पाळणे शक्य नसेल तर गरजेनुसार ॲबेटिंग करणे.

पाणीसाठ्यामुळेच डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. डासांची अळी तयार होऊ नये म्हणून पाणीसाठ्यामध्ये ॲबेटिंग करणे किंवा त्या हौदामध्ये गप्पी मासे सोडणे, या उपाययोजनाही जिल्हा हिवताप कार्यालयाकडून सुचविल्या जातात.

नाले वाहते करणे, कुंडी, टायर, नारळाचे टरफल यामध्ये पाणी साचून डासोत्पत्ती होते. ती होऊ न देणे आणि कोरडा दिवस पाळणे.