शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

जळकोट- बा-हाळी मार्गाच्या निर्मितीची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST

रस्ते हे विकासाचा मार्ग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मोठी गावे, शहरे एकमेकांना जोडली जातात. परिणामी, दळणवळण सुरू झाल्याने आर्थिक ...

रस्ते हे विकासाचा मार्ग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मोठी गावे, शहरे एकमेकांना जोडली जातात. परिणामी, दळणवळण सुरू झाल्याने आर्थिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे जळकोट ते बा-हाळी हा रस्ता निर्माण करावा, अशी गेल्या काही वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी जळकोट तालुक्यातील छोटे- मोठे व्यापारी, शेतकऱ्यांकडून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मागणीची दखल घेतली जात नाही. परिणामी, या भागातील नागरिकांसह व्यापाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

जळकोट- हळद वाढवणा- रावणकोळा- बा-हाळी हा मार्ग तयार झाल्यास जळकोट, मुक्रमाबाद, देगलूर येथील बाजारपेठा एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे व्यापारवृद्धी होणार आहे.

रावणकोळा ते बा-हाळी हा कच्चा रस्ता असल्याने हा रस्ता नेहमी वाहतुकीसाठी उपयुक्त नाही. बाजारपेठेच्या कामासाठी या मार्गाने ये- जा करणाऱ्या व्यापाऱ्यांसह बा-हाळी येथील साखर कारखान्यास ऊस पाठविणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तयार झाला नसल्याने अनेकदा मुखेडमार्गे बा-हाळी, मुक्रमाबाद व देगलूरला जावे लागते. हा मार्ग दुप्पट आहे. त्यातून वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे.

राज्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी...

विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी येथील नागरी सत्कार समारंभात या मार्गास तातडीने मंजुरी देऊ, अशी ग्वाही दिली होती. तथापि, दीड वर्ष झाले तरीही त्याची पूर्तता झाली नाही. हा रस्ता झाल्यास जवळच्या मार्गाने वाहतुकीची सोय होणार आहे. शिवाय, आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष अजिज मोमीन, शंकर वाघमारे, बागवान, सलीम बागवान, बालाजी राचेलवार, बळिराम नामवाड, खलील मोमीन, उस्मान बागवान, खुद्दूस मोमीन, अब्दुल बागवान, हबीब बागवान, सुभाष बनसोडे, बस्वराज सोप्पा यांनी केली आहे.