शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

खरीप पिके सुकू लागल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

तालुक्यातील प्रमुख पीक सोयाबीन आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने आणि बाजारात चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीनवर भर ...

तालुक्यातील प्रमुख पीक सोयाबीन आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने आणि बाजारात चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीनवर भर दिला. त्यापाठोपाठ उडीद, मूग, ज्वारी, कापसाची लागवड झाली. जळकोट हा तालुका डोंगरी असल्याने हलक्‍या प्रतीची जमीन अधिक आहे. त्यामुळे सतत पावसाची गरज भासते.

तालुक्यात एकूण ३५ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी २५ हजार हेक्‍टरवर पेरा झाला आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. पेरणीनंतर सतत पाऊस झाल्याने खरिपातील पिके बहरली. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन पदरी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. सततच्या पावसामुळे तलावात जलसाठा झाला होता. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

पाण्याअभावी पीक कोमेजू लागले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्याने त्यांचे वरुणराजाकडे लक्ष लागले आहे. येत्या चार दिवसांत पाऊस न झाल्यास संपूर्ण पिके वाळून जाण्याची भीती आहे.

गतवर्षीच्या पीकविम्याचे वाटप करावे...

कोरोनामुळे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत होते. अशा परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या पीकविम्याचे तत्काळ वाटप करावे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे. शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे मन्मथप्पा किडे, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, खादरभाई लाटवाले, नगरसेवक रमाकांत रायेवार, शिवानंद देशमुख, गोपाळकृष्ण गव्हाळे, ॲड. तात्या पाटील, बिरादार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, आयुब शेख, गोविंद केंद्रे आदींनी केली आहे.