शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

विवंचनेत असलेल्या नागरिकांनी मृत्यूला कवटाळले; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : मार्च २०२०पासून कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : मार्च २०२०पासून कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली. यातून आर्थिक विवंचना, मानसिक ताणतणाव आणि जगण्याचे प्रश्न गंभीर बनले. कोरोना कालावधीत तब्बल ५५२ नागरिकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी पोलीस दप्तरी नोंद आहे. गेल्या पाच महिन्यांत १४५ जणांनी आत्महत्या केली आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२०पासून जवळपास आठ महिने सर्वकाही ठप्प होते. छोटी-छोटी दुकाने, कारखाने आणि छोटी कामेही ठप्प झाल्याने अनेकांवर संकट ओढवले. अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांच्या दोनवेळच्या जेवणाची परिस्थिती गंभीर बनली. यामुळे अनेकांना उदरनिर्वाह कसा भागवावा, याचीच चिंता सतावत राहिली. अशा काळात अनेकांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्या टाळण्यासाठी वेळीच आर्थिक, सामाजिक आणि भावनिक आधार देण्याची गरज आहे.

हे दिवसही जातील

कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले. यातून चिंता मात्र वाढली आहे.

अनलॉकमुळे पुन्हा बाजारपेठ सुरू झाली असून, आर्थिक घडी बसेल, ही आशा अनेकांना आहे.

कोरोना नियमांचे पालन करत व्यवसाय करणे हा पर्याय आहे. आता हेही दिवस जातील, असे वाटते.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

घरातील कर्ता व्यक्ती ताणतणावाखाली असेल तर त्याला कुटुंबातील इतर सदस्यांनी मानसिक आधार देण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती कठीण असली तरी संयम आणि एकमेकांच्या आधाराने त्यावर मात करता येईल. आत्महत्या हा पर्याय नाही. येणारा दिवस सारखाच नसतो. संकटसमयीही प्रत्येक व्यक्तीने आशावादी आणि प्रयत्नशील असले पाहिजे. यासाठी कुटुंबाच्या आधाराची गरज आहे.

कोरोनाने अनेकांची झोप उडाली, ताणतणाव वाढला

पहिल्या लाटेत मानसिक तणावाखाली जगणाऱ्या रुग्णांची संख्या जेमतेम होती. मात्र, याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले. कोरोनाने अनेकांची झोप उडाली आहे. ताणतणावही वाढला आहे. याला आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न जबाबदार आहेत.

कोरोनाने अर्थचक्रच ठप्प झाल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून व्यसनांचे प्रमाणही वाढले आहे. काहीजण सुटका म्हणून व्यसनाचा आधार घेत आहेत. चिंतेमुळे झोप येत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या लाटेनंतर नैराश्य येण्याचे प्रमाण मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा आणि अभ्यासावरून तणाव आहे.