शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

विवंचनेत असलेल्या नागरिकांनी मृत्यूला कवटाळले; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : मार्च २०२०पासून कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : मार्च २०२०पासून कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली. यातून आर्थिक विवंचना, मानसिक ताणतणाव आणि जगण्याचे प्रश्न गंभीर बनले. कोरोना कालावधीत तब्बल ५५२ नागरिकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी पोलीस दप्तरी नोंद आहे. गेल्या पाच महिन्यांत १४५ जणांनी आत्महत्या केली आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२०पासून जवळपास आठ महिने सर्वकाही ठप्प होते. छोटी-छोटी दुकाने, कारखाने आणि छोटी कामेही ठप्प झाल्याने अनेकांवर संकट ओढवले. अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांच्या दोनवेळच्या जेवणाची परिस्थिती गंभीर बनली. यामुळे अनेकांना उदरनिर्वाह कसा भागवावा, याचीच चिंता सतावत राहिली. अशा काळात अनेकांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्या टाळण्यासाठी वेळीच आर्थिक, सामाजिक आणि भावनिक आधार देण्याची गरज आहे.

हे दिवसही जातील

कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले. यातून चिंता मात्र वाढली आहे.

अनलॉकमुळे पुन्हा बाजारपेठ सुरू झाली असून, आर्थिक घडी बसेल, ही आशा अनेकांना आहे.

कोरोना नियमांचे पालन करत व्यवसाय करणे हा पर्याय आहे. आता हेही दिवस जातील, असे वाटते.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

घरातील कर्ता व्यक्ती ताणतणावाखाली असेल तर त्याला कुटुंबातील इतर सदस्यांनी मानसिक आधार देण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती कठीण असली तरी संयम आणि एकमेकांच्या आधाराने त्यावर मात करता येईल. आत्महत्या हा पर्याय नाही. येणारा दिवस सारखाच नसतो. संकटसमयीही प्रत्येक व्यक्तीने आशावादी आणि प्रयत्नशील असले पाहिजे. यासाठी कुटुंबाच्या आधाराची गरज आहे.

कोरोनाने अनेकांची झोप उडाली, ताणतणाव वाढला

पहिल्या लाटेत मानसिक तणावाखाली जगणाऱ्या रुग्णांची संख्या जेमतेम होती. मात्र, याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले. कोरोनाने अनेकांची झोप उडाली आहे. ताणतणावही वाढला आहे. याला आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न जबाबदार आहेत.

कोरोनाने अर्थचक्रच ठप्प झाल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून व्यसनांचे प्रमाणही वाढले आहे. काहीजण सुटका म्हणून व्यसनाचा आधार घेत आहेत. चिंतेमुळे झोप येत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या लाटेनंतर नैराश्य येण्याचे प्रमाण मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा आणि अभ्यासावरून तणाव आहे.