शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

१० ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती, राजकीय मंडळींची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:02 IST

जळकोट : तालुक्यातील २७ पैकी केवळ एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने आता उर्वरित २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ...

जळकोट : तालुक्यातील २७ पैकी केवळ एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने आता उर्वरित २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येथील २१७ जागांसाठी ५०८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या १० ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे तिथे चुरशीच्या लढती होणार आहेत.

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातील तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने आणि १५० जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता २१७ जागांसाठी ५०८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तालुक्यातील वांजरवाडा, कुणकी, विराळ, सोनवळा, बेळसांगवी, धामणगाव, डोंगरकोनाळी, घोणसी, रावणकोळा, अतनूर, मरसांगवी या दहा ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींवर सर्व राजकीय मंडळींचे लक्ष वेधले आहे.

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी, शिवसेना अशा विविध पक्षांच्या राजकीय मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके यांच्या कुणकी, अनिता परगे यांच्या घोणसी ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान सभापती बालाजी ताकबिडे यांच्या वांजरवाडा ग्रामपंचायतीत तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषद सदस्या रुक्मिणीबाई जाधव यांच्या विराळ ग्रामपंचायतीत प्रतिष्ठेची लढत होत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे यांच्या गावातील ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होत आहे.

स्थानिक पातळीवरील राजकारण...

बेळसांगवी येथे जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या पॅनलच्या विरोधात त्यांच्या भावाने पॅनल उभे करून त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले यांच्या डोंगरकोनाळी ग्रामपंचायतींमध्येही दुरंगी लढत होत आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे यांच्या सोनवळा ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंचाचे पती, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांचे पॅनल असून, गंगाधर भोसले यांनी तिसरी आघाडी करून तिसरे पॅनल उभे केले आहे. जिल्हा परिषद सदस्या अनिता परगे यांच्याविरोधात दत्ता घोणसीकर यांचे पॅनल आहे.

अतनूरमध्ये साहेबराव पाटील येवले यांच्याविरोधात गव्हाणे पाटील यांचे पॅनल असून, दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील प्रमुख १० गावांतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे चुरशीच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.