शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सततच्या लाॅकडाऊनने वाढविले मुलांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

लाॅकडाऊन आणि शाळा बंद असल्यामुळे मुलांची फिजिकल ॲक्टिव्हीटी पूर्णत: बंद आहे. मैदानी खेळच बंद झाला आहे. त्यामुळे मुलं आपसुकच ...

लाॅकडाऊन आणि शाळा बंद असल्यामुळे मुलांची फिजिकल ॲक्टिव्हीटी पूर्णत: बंद आहे. मैदानी खेळच बंद झाला आहे. त्यामुळे मुलं आपसुकच टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेले आहेत. जेवण करतानाही अनेक मुलं मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवण करत नाहीत. टीव्ही पहातच जेवण असल्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक खाणे होते. त्यामुळे वजनात वाढ झाली आहे. यावर उपाय घरगुती खेळांचा आहे. मुलांना योगासन, सूर्यनमस्कार, सायकलिंग, दोरी आदी खेळात व्यस्त करणे आवश्यक बनले असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले.

व्यायाम करून घ्यावा

घरच्या घरी मुलांचा व्यायाम करून घेणे आवश्यक आहे. दोरी खेळणे, सूर्यनमस्कार, योगा, थोडीफार सायकलिंग करण्याकडे मुलांचा कल वाढविणे गरजेचे आहे. प्रोटिनयुक्त आहार त्यांना द्यावा. घरातील हलक्या छोट्या कामांमध्ये त्यांना व्यस्त ठेवावे. जेणेकरून मोबाईलचा वापर कमी होईल आणि चांगली सवयही लागेल.

मुलांना यापासून दूर ठेवा

स्निग्ध, तेलकट, तळीव पदार्थ मुलांना खावयास देऊ नयेत. ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळ कोणत्याही स्क्रीनपुढे मुलांना बसू देऊ नये. टिव्ही किंवा मोबाईल पहात खाऊ घालू नये. मुलांची शारीरिक हालचाल होईल याकडे कटाक्ष ठेवावा. लाॅकडाऊन असला तरी आपल्या घरातील व्यक्तिंसोबत मुलांना खेळते ठेवावे. कमीत कमी ४० मिनिटे व्यायाम असावा.

सततच्या लाॅकडाऊनमुळे मुलांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मैदानी खेळावर निर्बंध आले आहेत. सतत मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनपुढे ते असतात. जेवणही टीव्ही पहात पहातच होते. यात खाऊपणा वाढतो. त्यामुळे वजन वाढत आहे. मुलांचा घरच्या घरी व्यायाम करून घेणे आवश्यक आहे.

- डॉ. वर्धमान उदगीरकर

बालरोग तज्ज्ञ

पालक मुलांना घराबाहेर जाऊ देत नाहीत. त्यामुळे मुलं टी.व्ही. मोबाईलमध्ये व्यस्त राहत आहेत. कोरोनामुळे पालक मुलांना मोबाईल पाहण्यासाठी देतात. परंतु, त्याचा दुष्परिणाम दिसत आहे. छिडछिडेपणा वाढत आहे. मुलं रागीट बनत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना घरगुती खेळामध्ये व्यस्त करावे.

- डॉ. जितेन जैस्वाल,

बालरोग तज्ज्ञ

घरातच बसून असल्याने मुलांचे वजन वाढत आहे. चिडचिडेपणाही आहे. त्यामुळे मुलांसोबत पालकांनी घरपरिसरात व्यायाम, सायकलिंग, दोरी आदी खेळ खेळावेत. मुलांच्या स्थूलपणाबाबत भाष्य करता येत नाही. परंतु, घरातच मुलं असल्यामुळे वजन वाढत आहे, ही वस्तूस्थिती आहे. यावर दक्ष असावे.

- डॉ.संदीपान साबदे