शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात बालविवाह वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा कायद्याने विवाह करता येत नाही. परंतु, अज्ञान किंवा ...

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा कायद्याने विवाह करता येत नाही. परंतु, अज्ञान किंवा अन्य कारणांमुळे बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूण विवाहांच्या तुलनेत ३० टक्के विवाह बालविवाह असतात, असा अनुभव बाल हक्क अभियानाचे राज्य कार्यक्रम प्रमुख बी.पी. सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सहकार्याने जिल्ह्यात वर्षभराव ३० विवाह रोखण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी

गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, प्रत्येक गावात बालसंरक्षक समिती सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तरीही जिल्ह्यामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण आहे. बालविवाह होऊ नयेत म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच अन्य संस्थांकडून प्रबोधन आणि कायद्याबाबत जनजागृती केली जात असली तरी बालविवाहाच्या घटना होताना दिसत आहेत.

जिल्हा बाल संरक्षण विभागाने १७ विवाह रोखले

लाॅकडाऊन काळातील जून महिन्यात ४, जुलै महिन्यात ३, ऑगस्ट महिन्यात २, सप्टेंबर महिन्यात २, तर डिसेंबर महिन्यात ५ असे एकूण १७ बालविवाह रोखण्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाला यश आले असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी सांगितले. एका बालविवाह प्रकरणात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने गेल्या वर्षभरात ३० बालविवाह रोखले असल्याचे चाईल्ड लाईनचे म्हणणे आहे.

लाॅकडाऊन काळामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत जनजागृती आणि कारवाई केली जाते. वर्षभरात आम्ही १७ बालविवाह रोखले आहेत. एका प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्रत्येक गावात बालसंरक्षण समिती आहे.

-धम्मानंद कांबळे, बालसंरक्षण अधिकारी