शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात बालविवाह वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा कायद्याने विवाह करता येत नाही. परंतु, अज्ञान किंवा ...

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा कायद्याने विवाह करता येत नाही. परंतु, अज्ञान किंवा अन्य कारणांमुळे बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूण विवाहांच्या तुलनेत ३० टक्के विवाह बालविवाह असतात, असा अनुभव बाल हक्क अभियानाचे राज्य कार्यक्रम प्रमुख बी.पी. सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सहकार्याने जिल्ह्यात वर्षभराव ३० विवाह रोखण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी

गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, प्रत्येक गावात बालसंरक्षक समिती सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तरीही जिल्ह्यामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण आहे. बालविवाह होऊ नयेत म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच अन्य संस्थांकडून प्रबोधन आणि कायद्याबाबत जनजागृती केली जात असली तरी बालविवाहाच्या घटना होताना दिसत आहेत.

जिल्हा बाल संरक्षण विभागाने १७ विवाह रोखले

लाॅकडाऊन काळातील जून महिन्यात ४, जुलै महिन्यात ३, ऑगस्ट महिन्यात २, सप्टेंबर महिन्यात २, तर डिसेंबर महिन्यात ५ असे एकूण १७ बालविवाह रोखण्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाला यश आले असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी सांगितले. एका बालविवाह प्रकरणात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने गेल्या वर्षभरात ३० बालविवाह रोखले असल्याचे चाईल्ड लाईनचे म्हणणे आहे.

लाॅकडाऊन काळामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत जनजागृती आणि कारवाई केली जाते. वर्षभरात आम्ही १७ बालविवाह रोखले आहेत. एका प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्रत्येक गावात बालसंरक्षण समिती आहे.

-धम्मानंद कांबळे, बालसंरक्षण अधिकारी