शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात बालविवाह वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा कायद्याने विवाह करता येत नाही. परंतु, अज्ञान किंवा ...

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा कायद्याने विवाह करता येत नाही. परंतु, अज्ञान किंवा अन्य कारणांमुळे बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूण विवाहांच्या तुलनेत ३० टक्के विवाह बालविवाह असतात, असा अनुभव बाल हक्क अभियानाचे राज्य कार्यक्रम प्रमुख बी.पी. सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सहकार्याने जिल्ह्यात वर्षभराव ३० विवाह रोखण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी

गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, प्रत्येक गावात बालसंरक्षक समिती सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तरीही जिल्ह्यामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण आहे. बालविवाह होऊ नयेत म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच अन्य संस्थांकडून प्रबोधन आणि कायद्याबाबत जनजागृती केली जात असली तरी बालविवाहाच्या घटना होताना दिसत आहेत.

जिल्हा बाल संरक्षण विभागाने १७ विवाह रोखले

लाॅकडाऊन काळातील जून महिन्यात ४, जुलै महिन्यात ३, ऑगस्ट महिन्यात २, सप्टेंबर महिन्यात २, तर डिसेंबर महिन्यात ५ असे एकूण १७ बालविवाह रोखण्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाला यश आले असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी सांगितले. एका बालविवाह प्रकरणात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने गेल्या वर्षभरात ३० बालविवाह रोखले असल्याचे चाईल्ड लाईनचे म्हणणे आहे.

लाॅकडाऊन काळामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत जनजागृती आणि कारवाई केली जाते. वर्षभरात आम्ही १७ बालविवाह रोखले आहेत. एका प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्रत्येक गावात बालसंरक्षण समिती आहे.

-धम्मानंद कांबळे, बालसंरक्षण अधिकारी