शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरनं पाडलं, आमदार बच्चू कडुंनी 'त्या' गरिबाचं घर उभारलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:36 IST

लातूर जिल्ह्याच्या निलंगा येथील भारत कांबळे यांच्या घराची मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पडझड झाली होती. राज्य सरकारला या घटनेचा विसरही पडला.

लातूर - आमदार बच्चू कडू यांच्या कामाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. तसेच अपंग, गरीब, गरजू आणि वंचितांसाठी लढणार नेता, आमदार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. आता, लातूरमध्ये एका कुटुंबाला घर बांधून दिल्यामुळे पुन्हा एकदा बच्चू कडू सामन्यांसाठी हिरो ठरले आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत या पीडित कुटुंबाचे घर पडले होते.  

लातूर जिल्ह्याच्या निलंगा येथील भारत कांबळे यांच्या घराची मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पडझड झाली होती. राज्य सरकारला या घटनेचा विसरही पडला. मात्र, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेकडून पीडित भारत कांबळे यांना हे पडझड झालेलं घर बांधून देण्यात आलं. विशेष म्हणजे घराचा ताबा देताना खुद्द बच्चू कडू हजर राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 मे 2017 रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. ते निलंगा येथील कार्यक्रम आटोपून परतत असताना खराब वातावरणामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने फडणवीस यांच्यासह हेलिकॉप्टरमधील इतर सुखरूप बाहेर पडले. मात्र, या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निलंग्यातील भारत कांबळे यांच्या घराची पडझड झाली होती. याकडे सरकार अन् प्रशासनाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. मात्र, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे घर बांधून भारत कांबळे यांना त्यांच्या घराचा ताबा दिला. दीड वर्षानंतर हक्काच घरं उभारलेल्या कांबळेंच घर पाहण्यासाठी अन् या गृहसोहळ्यासाठी बच्चू कडू स्वत: उपस्थित राहिले होते.