शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार; अने प्रश्न अनुत्तरित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमूळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अकरावी प्रवेश घेण्यासाठी कोणते ...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमूळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अकरावी प्रवेश घेण्यासाठी कोणते निकष लावले जाणार याची चिंता आहे. लातूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. आवडीचे महाविद्यालय मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभागाच्या वतीने चाचणपणी केली जात आहे. यातील गुणावरच अकरावीचे प्रवेश निश्चित करण्याचा मानस आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणा-या विद्यार्थ्यांची सीईटी कोरोनाकाळात कशी घ्यायची असा प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. त्यामूळे राज्यस्तरावर अकरावी प्रवेशासाठी काय निर्णय होतो याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय...दहावीत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतन आणि आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

ऑफलाईन झाले तर कोरोनाचे काय...

ऑफलाईन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पून्हा ऑफलाईन परीक्षा घेतली तर कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑनलाईन सीईटी झाली तर ग्रामीण विद्यार्थ्यांचे काय...

कोराेनामूळे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान हाेणार आहे. त्यामुळे या परीक्षेला हजारो विद्यार्थी मूकतील. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याचा विचारही शिक्षण विभागाला करावा लागणार आहे.

अंतर्गत मूल्यमापन कसे होणार...

दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन अनेक शाळांमध्ये झालेले नाही. ऑनलाईन शिक्षण असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सुचनाच अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच मुल्यमापन कसे करावे याबाबत संभ्रम दूर होईल.

लातूरातील प्राचार्य म्हणतात...

अकरावी प्रवेशासाठी सर्वसमावेश सीईटी परीक्षा घेणे आवश्यक आहे. या परीक्षेत सर्व विषयांच्या प्रश्नांचा समावेश असल्यास विद्यार्थ्याचे कौशल्य दिसून येईल. त्यामुळे शिक्षण विभागाने लवकरात लवकर अकरावी प्रवेशासाठीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर करणे गरजेचे आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, शाहू महाविद्यालय, लातूर

कोरोनामुळे वर्षभर शाळा सुरु होऊ शकल्या नाही. काही कालावधीसाठी ऑफलाईन वर्ग झालेत मात्र, वाढत्या प्रादूर्भावामूळे सदरील वर्ग बंद झाले. परीक्षा रद्दमूळे पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेेणे गरजेचे आहे. दहावीच्या परीक्षा रद्द् झाल्याने अंतर्गत मुल्यमापान कसे करणार हा प्रश्न आहे. - प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद कॉलेज, लातूर

जिल्ह्यात अकरावी प्रवेशाठी जागा - ३२०००

लातूर शहरात अकरावी प्रवेशाठी जागा - १४०००