शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार; अने प्रश्न अनुत्तरित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमूळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अकरावी प्रवेश घेण्यासाठी कोणते ...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमूळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अकरावी प्रवेश घेण्यासाठी कोणते निकष लावले जाणार याची चिंता आहे. लातूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. आवडीचे महाविद्यालय मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभागाच्या वतीने चाचणपणी केली जात आहे. यातील गुणावरच अकरावीचे प्रवेश निश्चित करण्याचा मानस आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणा-या विद्यार्थ्यांची सीईटी कोरोनाकाळात कशी घ्यायची असा प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. त्यामूळे राज्यस्तरावर अकरावी प्रवेशासाठी काय निर्णय होतो याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय...दहावीत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतन आणि आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

ऑफलाईन झाले तर कोरोनाचे काय...

ऑफलाईन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पून्हा ऑफलाईन परीक्षा घेतली तर कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑनलाईन सीईटी झाली तर ग्रामीण विद्यार्थ्यांचे काय...

कोराेनामूळे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान हाेणार आहे. त्यामुळे या परीक्षेला हजारो विद्यार्थी मूकतील. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याचा विचारही शिक्षण विभागाला करावा लागणार आहे.

अंतर्गत मूल्यमापन कसे होणार...

दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन अनेक शाळांमध्ये झालेले नाही. ऑनलाईन शिक्षण असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सुचनाच अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच मुल्यमापन कसे करावे याबाबत संभ्रम दूर होईल.

लातूरातील प्राचार्य म्हणतात...

अकरावी प्रवेशासाठी सर्वसमावेश सीईटी परीक्षा घेणे आवश्यक आहे. या परीक्षेत सर्व विषयांच्या प्रश्नांचा समावेश असल्यास विद्यार्थ्याचे कौशल्य दिसून येईल. त्यामुळे शिक्षण विभागाने लवकरात लवकर अकरावी प्रवेशासाठीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर करणे गरजेचे आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, शाहू महाविद्यालय, लातूर

कोरोनामुळे वर्षभर शाळा सुरु होऊ शकल्या नाही. काही कालावधीसाठी ऑफलाईन वर्ग झालेत मात्र, वाढत्या प्रादूर्भावामूळे सदरील वर्ग बंद झाले. परीक्षा रद्दमूळे पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेेणे गरजेचे आहे. दहावीच्या परीक्षा रद्द् झाल्याने अंतर्गत मुल्यमापान कसे करणार हा प्रश्न आहे. - प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद कॉलेज, लातूर

जिल्ह्यात अकरावी प्रवेशाठी जागा - ३२०००

लातूर शहरात अकरावी प्रवेशाठी जागा - १४०००