शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

संत रविदास यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

प्रभाग नऊमध्ये नागरी सुविधेची मागणी लातूर : शहरातील प्रभाग नऊ मधील वडारवाडा भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी ...

प्रभाग नऊमध्ये नागरी सुविधेची मागणी

लातूर : शहरातील प्रभाग नऊ मधील वडारवाडा भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी शौचालयाची नवीन पाईपलाईन टाकावी, ड्रेनेज लाईनचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी अंकुश टकळहगे, नागनाथ मुद्दे, पप्पू धोत्रे, अजय नाईकवाडे, संतोष यमपुरे, परमेश्वर मुद्दे, मारुती मुद्दे, प्रल्हाद मुद्दे, बबन इरकल, अनिल धोत्रे, दत्ता धोत्रे यांनी शहर महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अभिनव मानव विकास संस्थेचा उपक्रम

लातूर : येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. यावेळी शुभदा चौकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या मनात नियमित अध्ययन, अभ्यासाबरोबर विविधांगी साहित्याबद्दल आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी भरती गोवंडे, मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. संस्थाध्यक्ष डॉ. चेतन सारडा, कमलकिशोर अग्रवाल, जयेश बजाज, अतुल देऊळगावकर यांनी मार्गदर्शन केले.

लेबर कॉलनी परिसरात पाण्याचे नियोजन कोलमडले

लातूर : शहरातील लेबर कॉलनी परिसरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे शहर महापालिकेने लक्ष देऊन लेबर कॉलनी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जिजामाता विद्यालयात विज्ञान दिन साजरा

लातूर : एमआयडीसी परिसरातील जिजामाता विद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सलीमा सय्यद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विज्ञान शिक्षक सुभाष म्हेत्रे, देविदास कोल्हे, वैशाली वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. प्रयोगांच्या मांडणीसाठी कलाशिक्षक बाळासाहेब बावणे, गोकुळ मतकंटे, भाग्यशाली गुडे, राजकुमार शिंदे, शंकर पांचाळ, बालाजी साबळे, अप्पासाहेब देशमुख, अर्जुन कांबळे यांनी सहकार्य केले.

मातृभूमी विद्यालयात जंतनाशक गोळ्या वाटप

लातूर : तालुक्यातील भातांगळी येथील मातृभूमी विद्यालयात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक उत्तम दोरवे,विजय अशोक साबदे, बंकट माणिकराव शिंदे, प्रल्हाद पांडुरंग ढवळे, सुधीर बिराजदार, पांडुरंग जगन्नाथ आकुच, गोविंद अलापुरे, शरणापा आंबुलगे, नेताजी पाटील, नेताजी राजेसाहेब पाटील, महादेव बब्रुवान पुरी, मनिषा स्वामी आदींसह विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.

वीजबिल भरणा करण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

लातूर : महावितरणच्या लातूर परिमंडळात पावणेदहा लाख वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने वीज बिल वसुली मोहीम राबविली जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिमंडळात लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. ज्यांच्याकडे वीज बिल थकीत आहे, त्या ग्राहकांनी तत्काळ भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

एसटीच्या माल वाहतूक योजनेला प्रतिसाद

लातूर : कोरोनाच्या काळात उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, परजिल्ह्यात मालाची वाहतूक केली जात आहे. लातूर विभागातील अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर आणि लातूर आगाराच्या वतीने विशेष माल वाहतूक करणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लातूर परिवहन महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

उन्हाचा पारा वाढताच माठ विक्रीसाठी दाखल

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे शहरातील बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गंजगोलाई, गूळ मार्केट, दयानंद गेट परिसर, राजीव गांधी चौक परिसरात आकर्षक माठांचे स्टॉल थाटले आहेत. उन्हाळ्यात गरिबांचे फ्रीज म्हणून माठ ओळखले जातात. सध्या मागणी कमी असली तरी आगामी काळात विक्रीत वाढ होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.

रेशीम लागवडीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

लातूर : जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढावे, यासाठी जिल्हा रेशीम विभागाच्या वतीने विविध गावात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येत आहे. रेशीम लागवडीचे तंत्रज्ञान, त्याचे फायदे, शासकीय योजना, विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ आदी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या मोहिमेत कृषी विभाग सहभागी असून, गावस्तरावर कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

शहरातील बाजारात फळांची आवक वाढली

लातूर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील बाजारात फळांची आवक वाढली आहे. दयानंद गेट परिसर, गंजगोलाई, रयतु बाजार, औसा रोड, रेणापूर नाका परिसरात फळांचे स्टॉल लागले आहे. सध्या सफरचंद, केळी, डाळिंब, चिकू, टरबूज, द्राक्ष, मोसंबी, संत्री आदी फळांची आवक होत असून, दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे फळविक्रेते सलमान बागवान यांनी सांगितले.

बाजार समितीत शेतमालाची आवक

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. सोयाबीन, गहू, बाजरी, ज्वारी, चिंच, गूळ, तूर, मूग, हरभरा आदींची आवक होत आहे. सोयाबीनचा दर ५ हजार रुपयांपर्यंत वाढला असल्याने आवक अधिक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मुख्य रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे काही ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी भागातील काही पथदिवे बंद आहेत. शहर महापालिकेने याकडे तत्काळ लक्ष देऊन बंद असलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.