येथील एमआयडीसीतील प्रणव मंगल कार्यालयात मालमत्ताधारकांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रदीप पाटील खंडापूरकर, कालिदास माने, रामदास पवार, ॲड. शेखर हविले, कुलदीपसिंग ठाकूर, रामेश्वर धुमाळ यांची उपस्थित होती. बैठकीत दस्त नोंदणी कार्यालयातील एजंट, गुंतवणूकदार, बिल्डर्स, डेव्हलपर्स, मुद्रांक विक्रेत्यांनी परिपत्रकामुळे रखडलेल्या व्यवहारावर चर्चा केली. १२ जुलै रेाजी काढण्यात आले परिपत्रक रद्द करावे, असा सर्वानुमते ठराव सहमत करण्यात आला. मुद्रांक विभागाच्या जाचक परिपत्र आल्यामुळे मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार त्रासदायक ठरत आहे. दीड पानी, सात पानी, ले आऊट, गुंठेवारी यासंदर्भातील परिपत्रक मुद्रांक नोंदणी अधिनियम कायद्याविराेधात असल्याने त्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला. हे परिपत्रक रद्द करावे, यासाठी ९ सप्टेंबर रोजी दस्त नोंदणी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे, कालिदास माने, प्रदीप पाटील खंडापूरकर, रामदास पवार, कुलदीपसिंह ठाकूर आदींनी मनोगत व्यक्त केले.
हजारोंचे व्यवहार रखडले...
शासनाच्या परिपत्रकामुळे जिल्ह्यात हजारो लोकांचे खरेदी विक्रीचे व्यवहार रखडले आहेत. शासनाचा हा निर्णय मालमत्ता खरेदी-विक्रीदारांना जाचक ठरत आहे. व्यवहारच बंद पडल्याने अनेकजण अडचणीत सापडले आहेत. परिपत्रक रद्द करून पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरळीत करावेत, यासाठी समस्त लातूरकरांच्या वतीने ९ सप्टेंबरला आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.