शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

एका ग्रामसेवकावर तीन-चार गावांचा भार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

अहमदपूर : तालुक्यातील गावांच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या अपुरी आहे. परिणामी, प्रत्येक ग्रामसेवकावर तीन-चार गावांच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

अहमदपूर : तालुक्यातील गावांच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या अपुरी आहे. परिणामी, प्रत्येक ग्रामसेवकावर तीन-चार गावांच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी, ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण वाढला असून गावातील विकास कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदपूर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची ६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५१ ग्रामसेवक, ८ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यात नियुक्तीस असलेले एक ग्रामसेवक अनुपस्थित आहेत. त्यामुळे ९७ ग्रामपंचायतींसाठी ५१ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी असल्याने एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. परिणामी, प्रशासकीय कामकाज करताना ग्रामसेवकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

प्रशासकीय कामकाजाचा ताळमेळ घालताना ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ग्रामसेवकांकडे त्यांच्या मूळ पदभारासह १५ ते २० किमी दूर असलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील विकास कामांवर परिणाम होत असल्याने तक्रारी वाढत आहेत. काही गावांतील नागरिकांकडून ग्रामसेवक गावात येत नसल्याची ओरड ऐकावयास मिळत आहे. सध्या ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण पडल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यात ९७ ग्रामपंचायती...

तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती असून त्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण पडत आहे. एक ग्रामपंचायत, एक ग्रामसेवक अशी व्यवस्था निर्माण करावी, म्हणून ग्रामसेवक संघटना राज्य शासनाकडे काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे गावांतील नागरिकांची कामे वेळेत होतील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात वेळेत आणि प्रभावीपणे राबविल्या जातील. ग्रामसेवकांना होणारा मानसिक ताणही कमी होईल. शासनाने लवकरात लवकर पद भरती करावी.

- श्याम मुस्के, तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना.

विकास कामांचा खोळंबा...

सध्या ग्रामसेवकांची संख्या कमी असल्याने दोन-तीन गावांचा त्यांच्यावर कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे खाेळंबत आहेत. एक गाव, एक ग्रामसेवक ही संकल्पना राबवावी, अशी मागणी रामानंद मुंडे लांजीकर यांनी केली आहे.