शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एका ग्रामसेवकावर तीन-चार गावांचा भार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

अहमदपूर : तालुक्यातील गावांच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या अपुरी आहे. परिणामी, प्रत्येक ग्रामसेवकावर तीन-चार गावांच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

अहमदपूर : तालुक्यातील गावांच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या अपुरी आहे. परिणामी, प्रत्येक ग्रामसेवकावर तीन-चार गावांच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी, ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण वाढला असून गावातील विकास कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदपूर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची ६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५१ ग्रामसेवक, ८ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यात नियुक्तीस असलेले एक ग्रामसेवक अनुपस्थित आहेत. त्यामुळे ९७ ग्रामपंचायतींसाठी ५१ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी असल्याने एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. परिणामी, प्रशासकीय कामकाज करताना ग्रामसेवकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

प्रशासकीय कामकाजाचा ताळमेळ घालताना ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ग्रामसेवकांकडे त्यांच्या मूळ पदभारासह १५ ते २० किमी दूर असलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील विकास कामांवर परिणाम होत असल्याने तक्रारी वाढत आहेत. काही गावांतील नागरिकांकडून ग्रामसेवक गावात येत नसल्याची ओरड ऐकावयास मिळत आहे. सध्या ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण पडल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यात ९७ ग्रामपंचायती...

तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती असून त्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण पडत आहे. एक ग्रामपंचायत, एक ग्रामसेवक अशी व्यवस्था निर्माण करावी, म्हणून ग्रामसेवक संघटना राज्य शासनाकडे काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे गावांतील नागरिकांची कामे वेळेत होतील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात वेळेत आणि प्रभावीपणे राबविल्या जातील. ग्रामसेवकांना होणारा मानसिक ताणही कमी होईल. शासनाने लवकरात लवकर पद भरती करावी.

- श्याम मुस्के, तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना.

विकास कामांचा खोळंबा...

सध्या ग्रामसेवकांची संख्या कमी असल्याने दोन-तीन गावांचा त्यांच्यावर कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे खाेळंबत आहेत. एक गाव, एक ग्रामसेवक ही संकल्पना राबवावी, अशी मागणी रामानंद मुंडे लांजीकर यांनी केली आहे.