शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दहावी, बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा भार आता शाळांवर पडला आहे. परिणामी, याचा मुख्याध्यापकांवर ताण वाढला आहे.

दहावी बोर्ड परीक्षा २३ एप्रिल, तर बारावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा नेमक्या कधी होतील, याविषयी अद्याप तरी अधिकृत माहिती सांगता येणार नाही. असे असले तरी मेअखेर किंवा जून महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यातच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप केले होते. त्यानंतर निर्णय बदलला.

परीक्षा कधी? पुढील परीक्षा कधी?

गतवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर कोरोनाचे संकट अधिक गतिमान झाले. मात्र, त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी अडचणी निर्माण झाल्या.

यंदा परीक्षा वेळेवर घेण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले होते. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोना बाधितांचा आलेख वाढला. यातूनच परीक्षा लांबणीवर टाकाव्या लागल्या.

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करून संबंधित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

परिणामी, महाराष्ट्रात शिक्षण मंडळाच्या वतीने काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

हे साहित्य ठेवावे लागणार कस्टडीत

परीक्षेसाठी वाटप केलेल्या साहित्यात कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅफ्ट, स्टिकर, सिटिंग प्लँट, एबी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक पेपरचे साहित्य, ओएमआर, गुणपत्रिका आदींचा समावेश आहे.

परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या निर्णयानंतर प्राप्त झालेले साहित्य सांभाळण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. पेपरचे नुकसान होणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांना काळजी घ्यावी लागेल.