सध्याच्या कोरोनाच्या काळात गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. परंतु, रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हे शिबिर लातुरातील माऊली ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आले.
याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, राजा पाटील, अर्जुन पाटील, ब्लड बँकेचे प्रमोद सूर्यवंशी, सोमनाथ बुरबुरे, स्वप्निल गायकवाड, विरेंद्र वाघमारे, भाऊसाहेब समुद्रे, गायकवाड, प्राचार्य डॉ. अजितसिंह गहेरवार, डाॅ. प्रदीप पाटील, प्रा.लखन बोंडगे, विलास बिरादार उपस्थित होते.
यावेळी ओम भंडारे, अभिषेक बिरादार, अजय शिंदे, वैभव भंडारे, पवन शिंदे, आदर्श तांबोळे, शुभम मसलगे, विशाल भोसले, अमोल भंडारे, सिद्धेश्वर निरवडे, शिवाजी शेटगार, बालाजी म्हेत्रे, दिगंबर पवार, सूरज स्वामी, सुनील गोपणे, ईश्वर होसुरे, अर्जुन पाटील, श्रीनिवास शिवणे, बालाजी शिवणे, शिवाजी कत्ते, विकास जानापुरे, अजय जानापुरे, अजय सगर, रोहित बिराजदार, हणमंत कापडे, प्रसाद भंडारे, आकाश डावरगावे, विजयकुमार स्वामी, आदर्श बदनाळे, आकाश खंडागळे, आकाश चव्हाण, आकाश वाघे, आशीष रेड्डी, गणेश पाटील, कृष्णा गुंडरे, विशाल सगरे, विष्णू गवळी, विष्णू बिरादार, किशोर भंडारे, सचिन सोनी, अनिल जाधव, विजय सगरे, अमर किरडे, सागर श्रीमंगले, गणेश सूर्यवंशी, नितीश बिरादार, वैशाली कत्ते, प्रा. लखन बोंडगे यांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. आनंद मुसळे, ओम भंडारे, अभिषेक बिरादार यांनी परिश्रम घेतले.