शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

ग्रामसभेवरून गावक-यांत संभ्रमाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST

वर्षभरापासून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा न झाल्याने गावांच्या विकासाचा वेग मंदावला आहे. विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे, तर आराखडे मंजूर ...

वर्षभरापासून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा न झाल्याने गावांच्या विकासाचा वेग मंदावला आहे. विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे, तर आराखडे मंजूर होऊन लांबणीवर पडले आहेत. शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक वर्ष संपले तरी एकही ग्रामसभा होऊ शकली नाही.

१ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होत असते. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते. परंतु, ग्रामसभा न झाल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचे लाभार्थी निवडता आलेले नाही. गेल्या वर्षीच्या १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा न झाल्याने रोहयोच्या आराखड्यावर चर्चा झाली नाही. तसेच २ ऑक्टोबर रोजीही ग्रामसभा न झाल्याने १५ व्या वित्त आयोगाच्या सुधारित आराखड्यावर चर्चा झाली नाही.

गत वर्षभरात परिसरातील बेलकुंड, उजनी, टाका, मासुर्डी, तुंगी यासह जवळपास ८ गावांतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झाले. नवीन कारभारी सत्तेवर आले. पण अजून एकही ग्रामसभा झाली नाही.

कामाचा लेखाजोखा मांडता येईना...

गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून सरपंच म्हणून मी गावचा कारभार पाहत आहे. याकाळात किमान एक तरी ग्रामसभा व्हायला हवी होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामसभेला शासनाने परवानगी दिली नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून ग्रामसभेला परवानगी मिळायला हवी. ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा लेखाजोखा ग्रामसभेमार्फत जनतेसमोर मांडता येईल.

- विष्णू कोळी, सरपंच, बेलकुंड