शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

आष्टामाेड - उदगीर महामार्गावरील धुरळ्याने प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST

डिगोळ : जिल्ह्यातील आष्टामाेड ते उदगीर या महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील धुराळ्यामुळे ...

डिगोळ : जिल्ह्यातील आष्टामाेड ते उदगीर या महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील धुराळ्यामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक, प्रवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खाेदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासाला दुप्पट वेळ लागत आहे. महामार्गाच्या कामासाठी ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या मातीमुळे धुरळ्यात हा रस्ताच हरवून गेला आहे. यातून अपघाताच्या घटनांमध्येही अलिकडे वाढ झाली आहे.

लातूर - आष्टामाेड ते उदगीर या प्रमुख मार्गाचे उदगीर - रेणापूर या नावाने राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. या महामार्गाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. रस्त्यावरील तिवटघाळपाटी ते येरोळमोडपर्यंतच्या या रस्त्याची गत दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. गत पावसाळ्यापासून तर रस्त्याचे चित्रच बदलून गेले आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणे आता कठीण झाले आहे. प्रवासालाही दुप्पट वेळ लागत आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने सध्या या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्त्यालगत खोदकाम करून मुरूम भरण्याचे काम सुरु आहे. मात्र, सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या पूर्वीच्या रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या नावावर दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांकडून होणारी ओरड पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर मातीचा वापर केला आहे. मातीवर पाण्याचा वापर न केल्याने धुरळा उडत आहे. या धुराळ्यात हा रस्ताच हरवून जात आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढले असून, धुराळ्यामुळे रस्त्यालगत असलेल्या गावांतील ग्रामस्थ, वाहनचालक, प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली आहे त्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यातून प्रवासी, वाहनचालकांची माेठ्या प्रमाणात हेळसांड हाेत आहे.