शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आशिव आरोग्य उपकेंद्राला नागरिकांनी ठोकले टाळे

By संदीप शिंदे | Updated: February 5, 2024 16:46 IST

सध्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

बेलकुंड : औसा तालुक्यातील आशिव येथील आरोग्य उपकेंद्र सतत बंद राहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगत नागरिकांनी सोमवारी उपकेंद्राला टाळे ठोकले.

आशिव गावची लोकसंख्या ९ हजारांवर असून, उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हे उपकेंद्र चालविले जाते. उपकेंद्रावर प्रत्येकी एक सामाजिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व आरोग्य सेवकाची नेमणूक असून या उपकेंद्रामार्फत आशिव, आशिव तांडा व वांगजी या गावांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र, उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याने राजीनामा दिला असून, आरोग्य सेविका सहा महिन्यांच्या विभागीय प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. त्यामुळे उपकेंद्र सतत बंद असते. 

आज लसीकरणाची तारीख असल्याने गावातील गराेदर महिला उपकेंद्राकडे आल्या असता त्यांना केंद्र बंद दिसले. तसेच गावातील नागरिकांनी चौकशी केली असता आरोग्यसेवक कार्यालयीन बैठकीसाठी औसा येथे गेले असल्याचे कळल्यावर संतप्त गावकऱ्यांनी उपकेंद्राला टाळे ठोकले. यावेळी नामदेव माने, गोविंद मदने, माधव देवकर, काका लोखंडे, विठ्ठल कांबळे, रोहीत लोळगे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता...सध्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मनुष्यबळ उपलब्ध होताच आशिवला प्राथमिकता दिली जाईल, तिथे तत्काळ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर