शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

न्यायालयाच्या आदेशानुसार लातुरात अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ

By हणमंत गायकवाड | Updated: May 4, 2023 19:33 IST

व्यावसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसर व या भागाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास महानगरपालिकेने गुरुवारपासून प्रारंभ केला आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी आपापली अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

गंजगोलाई व त्या परिसरातील सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिका क्रमांक ९६६९/२०१७ व ११५७२/२०१७ या दोन्ही याचिकांवर न्यायालयाने सुनावणी घेतली. ही अतिक्रमणे चार आठवड्यांच्या आत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ३ मे रोजी दिले आहेत. अतिक्रमणे चार आठवड्यांच्या आत काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार गुरुवारपासून मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ज्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत त्यांनी आपली अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत. मनपाकडून अतिक्रमणे काढण्यात आली तर व्यावसायिकांचे साहित्य परत दिले जाणार नाही. नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिकांनी स्वतःच आपली अतिक्रमणे काढून घेऊन महानगरपालिकेला व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरEnchroachmentअतिक्रमणCourtन्यायालय