शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

उदगीर बाजार समितीत शेतीमालाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST

जिल्ह्यातील लातूरनंतर सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ उदगीरची आहे. तीन राज्यांच्या सीमेवरील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांतून येथील बाजारपेठेत शेतीमालाची ...

जिल्ह्यातील लातूरनंतर सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ उदगीरची आहे. तीन राज्यांच्या सीमेवरील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांतून येथील बाजारपेठेत शेतीमालाची आवक होते. शेतमाल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने येथे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगही सुरू आहेत. शेतमाल खरेदीसाठी स्पर्धा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दरही मिळतो. त्यामुळे येथे दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यातून बाजार समितीलाही मोठे उत्पन्न मिळते.

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विविध बाजारपेठा बंद आहेत. कापड मार्केट, सराफ लाईन अशी दुकाने बंद आहेत. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून शासनाने फिजिकल डिस्टन्ससह अन्य नियम व अटी लागू करून व्यवहारास परवानगी दिली आहे. परंतु, येथील मोंढ्यात नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. सकाळी सौद्याच्यावेळी तर मोठी गर्दी असते. एका सौदात बाजार समितीचा एकच कर्मचारी असतो. हरभरा, तूर, सोयाबीनचा सौदा वेगवेगळ्या ठिकाणांहून निघत असला तरी व्यापाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.

रात्री १० वा. पर्यंत काम...

मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात व्यवहार करतेवेळी एका दिवशी एकाच शेतमालाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार होत असे. त्यामुळे सर्व कामे वेळेवर होत होती. यंदा जरी रात्री ८ वा. पर्यंत काम करण्यास मुभा दिली असली तरी प्रत्यक्षात रात्री १० ते ११ वाजेपर्यंत काम सुरू असते. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु, तो होऊ शकला नाही.

लॉकडाऊनच्या भीतीने आवक...

शासन अचानक लॉकडाऊन करेल, या भीतीपोटी शेतकरी आपला शेतमाल घेऊन येत आहेत. त्याचबरोबर शेतमालाचे दर वाढल्याने शुक्रवारी आवक वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम पाळून व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- संभाजी घोगरे, अध्यक्ष, आडत असो. उदगीर.