शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मनपात अनागोंदी कारभार; दलालांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST

ॲड. गोजमगुंडे म्हणाले, गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये मनपा क्षेत्रात कोणतेही विकासाचे काम झाले नाही. कोरोना काळ असल्यामुळे आम्ही प्रशासनाला व ...

ॲड. गोजमगुंडे म्हणाले, गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये मनपा क्षेत्रात कोणतेही विकासाचे काम झाले नाही. कोरोना काळ असल्यामुळे आम्ही प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांना कोणतीही अडचण केली नाही. सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करात बारा टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मनपाच्या गाळेधारकांनाही भाड्यामध्येही सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी राज्य शासनाची परवानगीची गरज असते. मात्र ती परवानगी घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनाने १२ टक्के मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णयाला परवानगी दिली नाही. परिणामी, हा कर मालमत्ताधारकांना भरावा लागणार आहे. गाळेधारक आणि मालमत्ता धारकांची ही फसवणूक आहे. बारा टक्के मालमत्ता कर आता पालकमंत्री आणि महापौरांनी स्वतःच्या खिशातून भरावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अनाधिकृत बांधकाम प्रकरणी शहरातल्या अनेक डॉक्टरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तोंड पाहून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांचे बांधकाम अधिकृत करण्यासाठी ''वाझे'' वसुली सुरू आहे, असा आरोप करीत ॲड. गोजमगुंडे यांनी महापौर आणि आयुक्त याला जबाबदार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला शैलेश स्वामी, संगीत रंधाळे, मंगेश बिराजदार आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांना महापौर पसंत नाहीत...

पालकमंत्र्यांना महापौर पसंत नाहीत आणि महापौरांना पालकमंत्री पसंत नाहीत. त्यामुळे शहरातला विकास ठप्प झाला आहे. विकासाचा खेळखंडोबा आहे. महापौर पसंत नसतील तर पालकमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि महापौरांना पालकमंत्री पसंत नसतील तर त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा. जनतेची फसवणूक करू नये, असेही ॲड. गोजमगुंडे म्हणाले.

श्रेयवादमळे विकास खुंटला : ॲड. दीपक मठपती

महापालिकेतील श्रेयवादामुळे विकास खुंटला आहे. गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये कोणतीही विकासाची कामे झाली नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण कामाचे आम्ही सर्वांना सोबत घेऊन भूमिपूजन केले होते. मात्र या कामाचा सत्ताधा-यांनी निधी अडवून धरला. मंजुरी मिळू दिली नाही, केवळ श्रेयवादामुळे या कामाची अडवणुक केली आहे. असा आरोप स्थायी समितीचे सभापती ॲड. दिपक मठपती यांनी या पत्रपरिषदेत केला.