शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मनपात अनागोंदी कारभार; दलालांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST

ॲड. गोजमगुंडे म्हणाले, गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये मनपा क्षेत्रात कोणतेही विकासाचे काम झाले नाही. कोरोना काळ असल्यामुळे आम्ही प्रशासनाला व ...

ॲड. गोजमगुंडे म्हणाले, गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये मनपा क्षेत्रात कोणतेही विकासाचे काम झाले नाही. कोरोना काळ असल्यामुळे आम्ही प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांना कोणतीही अडचण केली नाही. सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करात बारा टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मनपाच्या गाळेधारकांनाही भाड्यामध्येही सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी राज्य शासनाची परवानगीची गरज असते. मात्र ती परवानगी घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनाने १२ टक्के मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णयाला परवानगी दिली नाही. परिणामी, हा कर मालमत्ताधारकांना भरावा लागणार आहे. गाळेधारक आणि मालमत्ता धारकांची ही फसवणूक आहे. बारा टक्के मालमत्ता कर आता पालकमंत्री आणि महापौरांनी स्वतःच्या खिशातून भरावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अनाधिकृत बांधकाम प्रकरणी शहरातल्या अनेक डॉक्टरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तोंड पाहून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांचे बांधकाम अधिकृत करण्यासाठी ''वाझे'' वसुली सुरू आहे, असा आरोप करीत ॲड. गोजमगुंडे यांनी महापौर आणि आयुक्त याला जबाबदार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला शैलेश स्वामी, संगीत रंधाळे, मंगेश बिराजदार आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांना महापौर पसंत नाहीत...

पालकमंत्र्यांना महापौर पसंत नाहीत आणि महापौरांना पालकमंत्री पसंत नाहीत. त्यामुळे शहरातला विकास ठप्प झाला आहे. विकासाचा खेळखंडोबा आहे. महापौर पसंत नसतील तर पालकमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि महापौरांना पालकमंत्री पसंत नसतील तर त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा. जनतेची फसवणूक करू नये, असेही ॲड. गोजमगुंडे म्हणाले.

श्रेयवादमळे विकास खुंटला : ॲड. दीपक मठपती

महापालिकेतील श्रेयवादामुळे विकास खुंटला आहे. गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये कोणतीही विकासाची कामे झाली नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण कामाचे आम्ही सर्वांना सोबत घेऊन भूमिपूजन केले होते. मात्र या कामाचा सत्ताधा-यांनी निधी अडवून धरला. मंजुरी मिळू दिली नाही, केवळ श्रेयवादामुळे या कामाची अडवणुक केली आहे. असा आरोप स्थायी समितीचे सभापती ॲड. दिपक मठपती यांनी या पत्रपरिषदेत केला.