शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

गतवर्षीचा पीकविमा मंजुरीसाठी कृषी सहाय्यकांकडे अर्ज करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

सन २०१९ मध्ये तत्कालिन फडणवीस सरकारने जशी सरसकट नुकसान भरपाई दिली, त्याप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई दिली जाईल, अशी चर्चा ...

सन २०१९ मध्ये तत्कालिन फडणवीस सरकारने जशी सरसकट नुकसान भरपाई दिली, त्याप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई दिली जाईल, अशी चर्चा असल्याने शेतकऱ्यांनी तेव्हा नुकसान भरपाईचा वेगळा अर्ज केला नव्हता. परंतु, शासकीय यंत्रणेला नुकसान झाल्याचे कळविले होते. प्रत्येक गावात शासकीय यंत्रणेने जाऊन पाहणी केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, हे राज्य सरकारने मान्य केले.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची प्रक्रिया राज्य सरकारच्या कृषी आयुक्तांच्या माध्यमातून होते. निविदा काढून विमा कंपनी ठरविणे व करार करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तांची आहे. पीकविम्याच्या नुकसान भरपाईबाबत चौकशी केली असता ७२ तासांत लेखी अर्ज न केल्यामुळे विमा दिला नाही, असे सांगण्यात आले होते. कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंतच्या सर्व प्राप्त तक्रारी ग्राह्य धरल्या असून त्यांना विमा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एकीकडे राज्य सरकारने ३३ टक्के नुकसान झाल्याचे मान्य करून ४,५७,२१६ शेतकऱ्यांना अनुदान दिले. परंतु, विमा भरपाई केवळ ७५,६३२ शेतकऱ्यांना मिळाली आहे. उर्वरित ३,८१,५८४ शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु, सरसकट नुकसान भरपाई दिली जात नसल्यामुळे आता न्यायालयीन लढाईचा एक भाग म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन पोहच घ्यावी.

मागणी अर्जाची पोहोची एक प्रत गावातील सरपंचांना द्यावी.

गावातील सरपंच व सदस्यांनी ग्राम बैठक घेऊन विमा मंजूर करून वाटप करण्याबाबत ठराव घ्यावा व तो मुख्यमंत्र्यांकडे मागणीसाठी पाठवावा. शेतकऱ्यांचे वैयक्तिक अर्ज ग्रामपंचायतीत संकलित करावेत.

जर राज्य शासनाने विमा मंजुरीची कार्यवाही न केल्यास न्यायालयात धाव घेण्यात येईल, असेही आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.