शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

गतवर्षीचा पीकविमा मंजुरीसाठी कृषी सहाय्यकांकडे अर्ज करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

सन २०१९ मध्ये तत्कालिन फडणवीस सरकारने जशी सरसकट नुकसान भरपाई दिली, त्याप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई दिली जाईल, अशी चर्चा ...

सन २०१९ मध्ये तत्कालिन फडणवीस सरकारने जशी सरसकट नुकसान भरपाई दिली, त्याप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई दिली जाईल, अशी चर्चा असल्याने शेतकऱ्यांनी तेव्हा नुकसान भरपाईचा वेगळा अर्ज केला नव्हता. परंतु, शासकीय यंत्रणेला नुकसान झाल्याचे कळविले होते. प्रत्येक गावात शासकीय यंत्रणेने जाऊन पाहणी केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, हे राज्य सरकारने मान्य केले.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची प्रक्रिया राज्य सरकारच्या कृषी आयुक्तांच्या माध्यमातून होते. निविदा काढून विमा कंपनी ठरविणे व करार करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तांची आहे. पीकविम्याच्या नुकसान भरपाईबाबत चौकशी केली असता ७२ तासांत लेखी अर्ज न केल्यामुळे विमा दिला नाही, असे सांगण्यात आले होते. कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंतच्या सर्व प्राप्त तक्रारी ग्राह्य धरल्या असून त्यांना विमा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एकीकडे राज्य सरकारने ३३ टक्के नुकसान झाल्याचे मान्य करून ४,५७,२१६ शेतकऱ्यांना अनुदान दिले. परंतु, विमा भरपाई केवळ ७५,६३२ शेतकऱ्यांना मिळाली आहे. उर्वरित ३,८१,५८४ शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु, सरसकट नुकसान भरपाई दिली जात नसल्यामुळे आता न्यायालयीन लढाईचा एक भाग म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन पोहच घ्यावी.

मागणी अर्जाची पोहोची एक प्रत गावातील सरपंचांना द्यावी.

गावातील सरपंच व सदस्यांनी ग्राम बैठक घेऊन विमा मंजूर करून वाटप करण्याबाबत ठराव घ्यावा व तो मुख्यमंत्र्यांकडे मागणीसाठी पाठवावा. शेतकऱ्यांचे वैयक्तिक अर्ज ग्रामपंचायतीत संकलित करावेत.

जर राज्य शासनाने विमा मंजुरीची कार्यवाही न केल्यास न्यायालयात धाव घेण्यात येईल, असेही आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.