शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते, डोळ्यामागील विचारदृष्टी नव्हे:  नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:19 IST

समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे.

- धर्मराज हल्लाळे/दुर्गेश सोनार भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते. डोळ्यामागे दडलेली विचारदृष्टी नष्ट करू शकत नाही. ही दृष्टी देण्याचे काम साहित्य करते. त्यात वैचारिक मतभेद असू शकतील, पण मनभेद नको, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले. 

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी गडकरी म्हणाले, समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे. साहित्यिकांनी कोणत्या विषयावर लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, लेखन उद्दिष्ट काय याचाही विचार व्हावा. साहित्य जर राष्ट्रानुकूल, युगानुकूल असेल तरच देश जगाला मार्गदर्शन करू शकेल. 

‘समता व शौर्य ही महाराष्ट्राची ओळख’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा संदेश चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.  राष्ट्रपतींनी संदेशाची सुरुवात मराठीतून केली. समता आणि शौर्य ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रातील समृद्ध संत परंपरेचा दाखल देत त्यांनी संत तुकारामांचा अभंगही सादर केला.

राजकारणावर बोलू नये...शिक्षण, साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारणावर बोलू नये. राजकारणी साहित्य जाणणारा असेल तर त्याचे प्रतिबिंब धोरणात उमटते, हे सांगताना गडकरी यांनी सुधाकरराव नाईक, श्रीकांत जिचकार यांचा उल्लेख केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ८६२ गावांतील जनतेच्या कुचंबणेचा मुद्दा पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री बनसोडे यांनी मांडला. नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले तेव्हा, सीमा प्रश्नावर घोषणाबाजी झाली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlaturलातूरliteratureसाहित्य