शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप

By हरी मोकाशे | Updated: February 27, 2023 18:17 IST

पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी काँग्रेसचे आंदोलन 

औसा (लातूर) : थकित वीजबिलापोटी विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने १० दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडली आहे. परिणामी, शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेसने पालिकेत पालथ्या घागरी ठेऊन प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

५० हजार लोकसंख्येच्या औसा शहरात सध्या कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजना चांगल्या असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वीजबिल थकित राहिले आहे. परिणामी, दीड महिन्यात महावितरणने तिसऱ्यांदा पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीनेग्रेसच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. तसेच पालथ्या घागरी ठेवून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शकिल शेख, खुंदमिर मुल्ला, अंंगद कांबळे, अनिस जहागीरदार, पुरुषोत्तम नलगे, पाशा शेख, ॲड. समियोद्दीन पटेल, इस्माईल शेख, मुज्जमिल शेख, जयराज कसबे, नियामत लोहारे, उस्मान सिद्दिकी, मोहसीन शेख, अजहर पटेल आदींची उपस्थिती होती.

एमआयएमही आक्रमक...उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरात पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घंटागाड्याही बंद आहेत. त्यामुळे पालिकेला कुलूप ठोकण्याचा इशारा एमआयएमचे मुज्जफरअली सय्यद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल...पालिकेने थकित वीजबिलापोटी ८ लाख भरले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा महावितरणने बंद केल्यामुळे ७ ते ८ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. वीजबिल भरल्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा सोमवारी सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शहराला पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :laturलातूर