शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लातूर जिल्हा परिषदेत सबकुछ निलंगा, अध्यक्ष-उपाध्यक्षासह आता 2 सभापतीही निलंग्याचे

By admin | Updated: April 3, 2017 21:10 IST

जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि.3 - जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अध्यक्षपदासह सभापती पदेही निलंगा तालुक्याला दिल्याने लातूर जिल्हा परिषदेवर निलंग्याचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. समाजकल्याण सभापतीपदी संजय दोरवे, महिला बालकल्याण- संगीता घुले, अर्थ व बांधकाम- प्रकाश देशमुख, कृषी व पशुसंवर्धनच्या सभापतीपदी बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. 
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. ५८ पैकी ३७ सदस्य भारतीय जनता पक्षाचे असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडही बिनविरोध झाली होती. सोमवारी विषय समितीच्या सभापतींच्या निवडी झाल्या. प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने सर्व सभापती बिनविरोध निवडून आले. अहमदपूर तालुक्यातील हडोळती मतदारसंघातील भाजपाचे प्रकाश देशमुख यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभाग सोपविण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील कासारशिरसी गटातून निवडून आलेले बाळासाहेब जाधव यांना कृषी व पशुसंवर्धन, हलगरा गटातून निवडून आलेले संजय दोरवे यांच्याकडे समाजकल्याण तर रेणापूर तालुक्यातील कामखेडा गटातून निवडून आलेल्या संगीता घुले यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध वर्णी लागली आहे. 
नूतन सभापतींचा सत्कार... 
विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते सभापती प्रकाश देशमुख, संजय दोरवे, संगीता घुले, बाळासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष तिरुके म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांनी पक्षीय भेद विसरून विकासासाठी काम केले. त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे.