शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयाचा विवाह मुहूर्त हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST

अहमदपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अक्षय तृतीयाचा विवाहाचा मुहूर्त हुकणार आहे. उपवर वधू-वरांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर ...

अहमदपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अक्षय तृतीयाचा विवाहाचा मुहूर्त हुकणार आहे. उपवर वधू-वरांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर कायदेशीर मर्यादेमुळे कार्यक्रमांना पायबंद बसला आहे. शुभमंगलसाठी आता सावधानता बाळगण्याची गरज आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेचा असल्याने हा दिवस शुभ मानला जातो. या मुहूर्तावर विवाह पार पडतात. शहर व तालुक्यातील अनेक जण हा मुहूर्त निवडतात. वर्षापासून वधू-वर व त्यांचे आई-वडील या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत असतात. मात्र मागील वर्षी व यंदाही लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकणार आहे. तसेच कार्यक्रमांनाही ब्रेक लागला आहे. या मुहूर्तावर वास्तुशांती, धार्मिक कार्यक्रम, नामकरण सोहळा आयोजित केला जातो. परंतु, कायदेशीर बंधनांमुळे अडचणी आल्या आहेत.

काही वधू-वरांनी उपलब्ध परिस्थितीत लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. मंगल कार्यालयास परवानगी नसल्यामुळे आपल्या घरासमोर विनामंडप केवळ मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे इतर धार्मिक विधी नाहीत. आता आणखीन १५ दिवस लॉकडाऊन वाढल्यामुळे विवाह मुहूर्त ज्येष्ठ अथवा आषाढ महिन्यात आहेत.

शुभ मंगलसाठी परवानगीची गरज...

विवाहासाठी तहसीलदार, पोलीस ठाणे व नगरपालिकेकडे अर्ज करणे बंधनकारक असून त्याची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. त्यामुळे बहुतांश वधू-वर पित्याने विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.

कोविड टास्क फोर्सचे लक्ष...

विवाहासाठी केवळ २५ वऱ्हाडींची मर्यादा आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावात तलाठी, कोतवाल व पोलीस पाटलांवर जबाबदारी दिली आहे. त्यांनी माहिती न दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यात होणाऱ्या विवाह सोहळ्याची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे प्राप्त होणार आहे. सर्वांनी नियमाचे काटेकोर पालन करून विवाह करावा, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले.

सुवर्ण खरेदीस मर्यादा...

प्रत्येक अक्षय तृतीयेस किमान एक गुंजपासून सुवर्ण खरेदी केली जाते. मात्र लॉकडाऊनमुळे सराफा व्यापार बंद असल्यामुळे सोने खरेदीला मंदी आली आहे. त्यामुळे शहरातील सराफा व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे व्यापारी माधव वलसे, अश्विन आंधळे यांनी सांगितले.