शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयाचा विवाह मुहूर्त हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST

अहमदपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अक्षय तृतीयाचा विवाहाचा मुहूर्त हुकणार आहे. उपवर वधू-वरांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर ...

अहमदपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अक्षय तृतीयाचा विवाहाचा मुहूर्त हुकणार आहे. उपवर वधू-वरांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर कायदेशीर मर्यादेमुळे कार्यक्रमांना पायबंद बसला आहे. शुभमंगलसाठी आता सावधानता बाळगण्याची गरज आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेचा असल्याने हा दिवस शुभ मानला जातो. या मुहूर्तावर विवाह पार पडतात. शहर व तालुक्यातील अनेक जण हा मुहूर्त निवडतात. वर्षापासून वधू-वर व त्यांचे आई-वडील या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत असतात. मात्र मागील वर्षी व यंदाही लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकणार आहे. तसेच कार्यक्रमांनाही ब्रेक लागला आहे. या मुहूर्तावर वास्तुशांती, धार्मिक कार्यक्रम, नामकरण सोहळा आयोजित केला जातो. परंतु, कायदेशीर बंधनांमुळे अडचणी आल्या आहेत.

काही वधू-वरांनी उपलब्ध परिस्थितीत लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. मंगल कार्यालयास परवानगी नसल्यामुळे आपल्या घरासमोर विनामंडप केवळ मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे इतर धार्मिक विधी नाहीत. आता आणखीन १५ दिवस लॉकडाऊन वाढल्यामुळे विवाह मुहूर्त ज्येष्ठ अथवा आषाढ महिन्यात आहेत.

शुभ मंगलसाठी परवानगीची गरज...

विवाहासाठी तहसीलदार, पोलीस ठाणे व नगरपालिकेकडे अर्ज करणे बंधनकारक असून त्याची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. त्यामुळे बहुतांश वधू-वर पित्याने विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.

कोविड टास्क फोर्सचे लक्ष...

विवाहासाठी केवळ २५ वऱ्हाडींची मर्यादा आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावात तलाठी, कोतवाल व पोलीस पाटलांवर जबाबदारी दिली आहे. त्यांनी माहिती न दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यात होणाऱ्या विवाह सोहळ्याची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे प्राप्त होणार आहे. सर्वांनी नियमाचे काटेकोर पालन करून विवाह करावा, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले.

सुवर्ण खरेदीस मर्यादा...

प्रत्येक अक्षय तृतीयेस किमान एक गुंजपासून सुवर्ण खरेदी केली जाते. मात्र लॉकडाऊनमुळे सराफा व्यापार बंद असल्यामुळे सोने खरेदीला मंदी आली आहे. त्यामुळे शहरातील सराफा व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे व्यापारी माधव वलसे, अश्विन आंधळे यांनी सांगितले.