शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; विवाह सोहळेही झाले लाॅकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. यावर्षी तरी अक्षय तृतीया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. यावर्षी तरी अक्षय तृतीया मुहूर्त हुकणार नाही, असे अनेकांना वाटत होते; परंतु गतवर्षीचीच पुनरावृत्ती यावर्षी झाली असून, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे.

विवाह, धार्मिक विधी आदींना नियम पाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, तर नियम न पाळल्यास दंडही भरावा लागत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ८, मे महिन्यात १६ आणि जून महिन्यात ८ विवाहाचे मुहूर्त आहेत. मे महिन्यातील मुहूर्त तर केव्हाच हातातून गेले आहेत. अक्षय तृतीया मुहूर्तावर तरी लाॅकडाऊन संपेल, असे अनेकांना वाटले होते; परंतु हा मुहूर्तही लाॅकडाऊनमुळे हुकला आहे. परिणामी, मंगल कार्यालये तसेच विवाहविषयक कामावर आपली उपजीविका भागविणाऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. दंडात्मक कारवाई होत असल्याने बंधने आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने विवाहासाठी केवळ २५ व्यक्तींनाच मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी दोन तासांतच विवाह सोहळा उरकावा लागत आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रत्येकी ५० हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडावा. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, नियमांचे पालन गरजेचे आहे.

दरवर्षी मे महिन्यात मंगल कार्यालयांसाठी बुकिंग असायच्या. मात्र गेल्या दीड वर्षांपासून अल्प प्रतिसाद आहे. सध्या संचारबंदी लागू असल्याने विवाह सोहळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. त्यातही अनेक जण घरच्या घरीच पसंती देत असल्याने मंगल कार्यालयांचे नुकसान आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक विवाह होतात. मंडप, डेकोरेशनसाठी ऑर्डर असतात. मात्र, यंदा हा मुहूर्त हातातून गेला आहे. त्यामुळे व्यवसाय अडचणीत आला आहे. दीड वर्षापासून कोरोनामुळे व्यवसायाचे नुकसान होत आहे. यावर्षी परिस्थिती सुधारेल, असे चित्र होते.

- कृष्णात आकनगिरे,

मंडप व्यावसायिक

आनंदोत्सवाला कोरोनाचे नियम आडवे

कोरोनामुळे दररोज बाधितांचा आलेख वाढत आहे. शासनाने त्यामुळे लाॅकडाऊन लागू केले आहे. अक्षय तृतीया चांगला मुहूर्त असल्याने अनेकांनी विवाहाच्या तारखाही काढून ठेवल्या होत्या.

कोरोनाच्या आधी विवाह समारंभ मोठ्या आनंदोत्सवात साजरे होत असत. मात्र यावेळेस कोरोनाचे नियम आडवे आले असल्याने मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह उरकावे लागत आहेत.

दरम्यान, अनेकांनी मे महिन्याऐवजी जून महिन्यात मुहूर्त काढले आहेत. मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाच्या संकटामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हातातून गेला असल्याचे चित्र आहे. परिणामी, वधू-वर पित्यांमधून नाराजीचा सूर आहे.