शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

गृहविलगीकरणातील १८ बाधितांशी संवाद होईना, शोध घेण्यासाठी प्रशासनाची उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST

अहमदपूर : तालुक्यात काेरोनाचा संसर्ग वाढत असताना होम क्वाॅरंटाईन असलेल्यांपैकी काहीजण नियमांचे उल्लंघन करीत घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत ...

अहमदपूर : तालुक्यात काेरोनाचा संसर्ग वाढत असताना होम क्वाॅरंटाईन असलेल्यांपैकी काहीजण नियमांचे उल्लंघन करीत घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुरुवारी प्रशासनाच्या वतीने गृहविलगीकरणातील बाधितांचा शोध घेण्यात आला. तालुक्यातील ३०७ पैकी १८ जणांशी मोबाईलवरून संवाद होत नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीन निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. दरम्यान, गृहविलगीकरणातील काही जण नियमांचे उल्लंघन करीत बाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढून आरोग्य विभागावर अधिक ताण पडत आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी आणि गृहविलगीकरणातील बाधित व्यक्ती घरीच आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तपासणी मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यात एकूण ३५७ कोरोनाबाधित आहेत. त्यातील ३३ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर ३०७ जण गृहविलगीकरणात आहेत. उर्वरित बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारच्या तपासणीत गृहविलगीकरणातील १८ बाधितांचा शोध लागला नाही. सदरील रुग्णांनी दिलेला मोबाईल क्रमांक लागत नाही. त्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, सदरील बाधितांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.

त्या बाधितांचा शोध सुरू

गृहविलगीकरणातील ३०७ पैकी १८ जणांनी दिलेला मोबाईल क्रमांक लागत नाही. त्यामुळे तो चुकीचा अथवा कव्हरेज क्षेत्राबाहेर दाखवित आहे. या बाधितांचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत आहे. त्यांचा शोध घेऊन लवकरच त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सरपंचासह ६ शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस...

अहमदपूर तालुक्यातील मोघा येथे विनापरवाना कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नियमापेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेथील सरपंचासह सहा शासकीय कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मोघा येथील एका धार्मिक कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्स न राखता ३०० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्याचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या पथकास आढळून आले. सदरील कार्यक्रमाची माहिती कार्यालयात न दिल्याने सरपंचासह तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस पाटील, कोतवाल व कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत खुलासा सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. समाधानकारक उत्तर न आल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे.

विनापरवाना घेण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या व्यक्तींची माहिती मुख्य कार्यालयास अवगत करणे गरजेचे आहे. यात कसूर केल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे. काही नागरिक व शासकीय कर्मचारी आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.