शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

लातूर विभागीय मंडळाचा ९९.९६ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यामध्ये लातूर विभागीय ...

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यामध्ये लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. मूल्यमापन केलेल्या १ लाख १० हजार ३४२ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार २८८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी - १ मध्ये ३९ हजार ६३७, श्रेणी - २ मध्ये ४ हजार ७३०, पास श्रेणीत ४ हजार १८६ असे एकूण १ लाख ९ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर शासन निर्णयानुसार, निकाल समितीचे गठन करुन त्यांना विषय व वर्गशिक्षक यांनी केलेल्या मूल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ४० हजार २८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार २७७ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले. या मूल्यमापनात २२ हजार ८०६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर श्रेणी - १ मध्ये १४ हजार १९१, श्रेणी - २ मध्ये २ हजार ७, पास श्रेणीमध्ये १ हजार ११८ असे एकूण ४० हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६१ टक्के आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून २२ हजार ७३३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले. या मूल्यांकनात १२ हजार ४४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी - १ मध्ये ८ हजार ५७, श्रेणी - २ मध्ये १ हजार ३२४ तर पास श्रेणीत ७८० असे एकूण २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४२ टक्के आहे.

नांदेड जिल्ह्यात ४७ हजार ३३८ विद्यार्थ्यांची नोंदणी मूल्यांकनासाठी झाली होती. प्रत्यक्ष मूल्यांकन ४७ हजार ३३३ विद्यार्थ्यांचे झाले. या मूल्यांकनात २६ हजार ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी - १ मध्ये १७ हजार ३८९, श्रेणी - २ मध्ये १ हजार ३९९ आणि पास श्रेणीत २ हजार २८८ असे एकूण ४७ हजार ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.५४ टक्के आहे.