शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

लातूर विभागातून ९६ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By संदीप शिंदे | Updated: February 19, 2024 17:30 IST

लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात २३८ केंद्र आहेत

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारी, बुधवारपासून सुरुवात होणार असून, लातूर विभागीय मंडळातील ९६ हजार १७९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. यासाठी २३८ केंद्रांची निवड करण्यात आली असून, बुधवारी पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

लातूर विभागीय मंडळात नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा यापुर्वीच पार पडल्या आहेत. बुधवारपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार असून, लातूर जिल्ह्यात ९५, धाराशिव ४२ आणि नांदेड जिल्ह्यातील १०१ केंद्रावर या परीक्षा होणार आहेत. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधती परीक्षा होणार असून, काही विषयांचे पेपर सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा सत्रात होणार आहेत.

बोर्डाकडून ४६ परिरक्षकांची नियुक्ती...लातूर विभागीय मंडळाकडून लातूरसाठी १७, नांदेड १९ आणि धाराशिवसाठी १० परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी यापुर्वीच संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. दरम्यान, बारावीच्या परीक्षा बुधवारपासून सुरु होत असून, केंद्रप्रमुख, परिरक्षक आणि भरारी पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होणार असून, लातूर विभागीय मंडळाने सर्व तयारी पुर्ण केली असल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरexamपरीक्षा