शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

लातूरसाठी ६२.१५ टक्के मतदान; तीन गावांचा बहिष्कार राहिला कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:46 IST

तीन गावांमध्ये बहुसंख्य जणांचा बहिष्कार अखेरपर्यंत राहिला.

लातूर : जिल्ह्यात रस्ता, पीकविमा व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सुनेगाव-शेंद्री, तळेगाव (बोरी) आणि गोटेवाडी या तीन गावांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला, तर आनंदवाडी, पिरू पटेलवाडी, रामघाट तांडा येथील मतदान केंद्रांकडे दुपारपर्यंत कोणीही फिरकले नव्हते. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६२.१५ टक्के मतदान झाले. 

अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव-शेंद्री या गावाला रस्ता नसल्याने पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. पाच किलोमीटरच्या मार्गासाठी १४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. दरम्यान, रस्त्याच्या मागणीसाठी ५५५ मतदार असलेल्या सुनेगाव केंद्रावर एकानेही मतदान केले नाही. तर औसा तालुक्यातील गोटेवाडी येथील ग्रामस्थांनीही पाणी व रस्त्याच्या मागणीसाठी बहिष्कार टाकला. एकूण २२२ मतदारांपैकी १७ जणांनी मतदान केले. तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी येथे एकूण मतदारांची संख्या १५०५ असून, त्यातील केवळ ५ जणांनी मतदान केले. सदर गावाला पीकविमा, रस्ता व दुष्काळाच्या उपाययोजना नाहीत.

तीन गावांमध्ये बहुसंख्य जणांचा बहिष्कार अखेरपर्यंत राहिला. चाकूर तालुक्यातील आनंदवाडी, पिरु पटेलवाडी, रामघाट तांडा येथे आश्वासन मिळाल्याने दुपारनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. दरम्यान, आनंदवाडी येथे मतदान संपण्याला काही अवधी असताना केंद्रात सहा पूर्वी दाखल झालेल्या मतदारांचे रात्री ११पर्यंत मतदान चालले. एकुण ७५३ मतदारांनी हक्क बजावला. 

मतदान शांततेतलातूर लोकसभा मतदारसंघात ६२.१५ टक्के मतदान झाले असून, अंतिम आकडेवारी रात्री उशिरा हाती येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. कुठेही मतदान यंत्र बिघाडाचे वृत्त नसून, सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019