शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

धनेगाव बॅरेजेसमध्ये ५१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST

वलांडी : देवणी तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीवरील निलंगा, देवणी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या धनेगाव येथील उच्चस्तरीय ...

वलांडी : देवणी तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीवरील निलंगा, देवणी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या धनेगाव येथील उच्चस्तरीय बॅरेजेसमध्ये यावर्षी सद्यस्थितीत ५१.४५ टक्के पाणीसाठा असून, शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. या प्रकल्पातून कार्यान्वित करण्यात आलेल्या हेळंब व शिऊर या दोन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, धनेगाव धरणाची साठवण क्षमता ११.३११ दशलक्ष घनमीटर असून, आजघडीस धरणात ५१.४५ टक्के पाणी उपलब्ध आहे.

पावसाळ्यापूर्वी या धरणात २.९० दशलक्ष घनमीटर पाणी होते. धरणाची उंची ८.५ मीटर असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास गिरकचाळ कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली जातो, तर हेळंब धनेगाव जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम चालू असल्याने यावर्षी ८ मीटर पाणी थांबविण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे १४.८६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून, त्यात धनेगाव, शिरूर, हेळंब, वळसांगवी, शिरोळ, वांजरवाडा, हिसामनगर, गिरकचाळ, जवळगा, टाकळी, वलांडी, बसपूर, बाकली, कवठाळा, घुगी, सांगवी, साकोळ, उजेड, निटूर या गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे शून्य पॉईंट डोंगरगाव असून, धरणात गतवर्षीपासून पूर्ण क्षमतेने पाणी थांबविण्यात येत आहे. या धरणात होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे परिसरातील वलांडी, जवळगा, धनेगाव, टाकळी, हेळंब, माटेगडी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. वलांडी महसूल मंडलात गतवर्षी ३५० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. यावर्षी त्यात वाढ होऊन १ हजार ११५ हेक्‍टरवर उसाची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे विनायक सूर्यवंशी यांनी दिली. धरण क्षेत्रात पाणी थांबल्याने वलांडी परिमंडलातील विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी वाढली आहे. धरण क्षेत्रातील भागात मोठा पाऊस झाल्यास धनेगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होणार आहे.

पुलाचे काम तत्काळ करण्यात यावे...

धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील धनेगाव, हेळंब रस्त्यावरील पुलाचे उर्वरित काम तत्काळ करावे. कामाला बाधा ठरत असलेल्या पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी धनेगाव व हेळंब ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

धनेगाव बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या पलीकडे असलेल्या जमिनीत शेती कसणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. यासाठी धनेगावकरांना १० किमीचा पल्ला पार करावा लागतो. हेळंब - धनेगाव दळणवळणही बंद होणार आहे. सद्यस्थितीला पाणीपातळी कमी केल्यास उर्वरित पुलाचे काम पूर्ण होऊ शकते, असे धनेगावचे उपसरपंच कुमार पाटील, हेळंबचे सरपंच गोरख सावंत यांनी सांगितले.