शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

‘शाळा सिद्धी’कडे ५०३ शाळांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 00:20 IST

लातूर : शाळांचा दर्जा वाढावा, भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ताही वाढीस लागावी, यासाठी शासनाच्या वतीने ‘शाळा सिद्धी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

लातूर : शाळांचा दर्जा वाढावा, भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ताही वाढीस लागावी, यासाठी शासनाच्या वतीने ‘शाळा सिद्धी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील २६३९ पैकी १७३६ शाळांनी सहभाग नोंदवीत आपले स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. ५०३ शाळांनी मात्र याकडे पाठच फिरविल्याचे दिसून येत आहे.शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ७ क्षेत्र आणि ४६ मानकानुसार गुण देण्यात येणार आहेत. त्यात वर्ग निरीक्षण, शाळांच्या भौतिक सुविधा, शाळांचे गुणवत्ता, शिक्षक प्रशिक्षण, ग्रंथालय, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत स्वच्छतागृह, रॅम्प अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेबरोबर नगर परिषद, महानगरपालिका व खासगी शैक्षणिक संस्थांनाही शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन करणे बंधनकारक केले आहे. तीन वर्षांत शाळा सिद्धीचे प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक असून, हे प्रमाणपत्र पाच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ६३९ शाळा आहेत. त्यापैकी स्वयंमूल्यमापनासाठी १ हजार ७३६ शाळांनी नोंदणी करून ते स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. तसेच ४०० शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम प्रगतिपथावर असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ५०३ शाळांनी या उपक्रमात सहभागच घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागास असलेल्या शाळांची प्रगती कशी होणार, असा सवाल पालकांतून केला जात आहे.