शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘शाळा सिद्धी’कडे ५०३ शाळांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 00:20 IST

लातूर : शाळांचा दर्जा वाढावा, भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ताही वाढीस लागावी, यासाठी शासनाच्या वतीने ‘शाळा सिद्धी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

लातूर : शाळांचा दर्जा वाढावा, भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ताही वाढीस लागावी, यासाठी शासनाच्या वतीने ‘शाळा सिद्धी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील २६३९ पैकी १७३६ शाळांनी सहभाग नोंदवीत आपले स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. ५०३ शाळांनी मात्र याकडे पाठच फिरविल्याचे दिसून येत आहे.शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ७ क्षेत्र आणि ४६ मानकानुसार गुण देण्यात येणार आहेत. त्यात वर्ग निरीक्षण, शाळांच्या भौतिक सुविधा, शाळांचे गुणवत्ता, शिक्षक प्रशिक्षण, ग्रंथालय, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत स्वच्छतागृह, रॅम्प अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेबरोबर नगर परिषद, महानगरपालिका व खासगी शैक्षणिक संस्थांनाही शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन करणे बंधनकारक केले आहे. तीन वर्षांत शाळा सिद्धीचे प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक असून, हे प्रमाणपत्र पाच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ६३९ शाळा आहेत. त्यापैकी स्वयंमूल्यमापनासाठी १ हजार ७३६ शाळांनी नोंदणी करून ते स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. तसेच ४०० शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम प्रगतिपथावर असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ५०३ शाळांनी या उपक्रमात सहभागच घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागास असलेल्या शाळांची प्रगती कशी होणार, असा सवाल पालकांतून केला जात आहे.