विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत शनिवारी ९७० व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १ हजार २० व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. त्यात २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही मिळून १ हजार ९९० व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सद्य:स्थितीत रुग्णालयात ६७ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२९ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ३ हजार ७१५ दिवसांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.६ टक्क्यांवर आहे. दरम्यान, शनिवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ७ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सुटी देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.
१ हजार ९९० व्यक्तींच्या चाचण्यात ५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST