१७६० मध्ये उदगीरच्या भुईकोट किल्ल्यात झालेली लढाई ऐतिहासिक आहे. उदगीर ते पानिपतपर्यंत ऐतिहासिक संदर्भ घडविणाऱ्या या किल्ल्याची विजयी महती देशाच्या इतिहासात नोंद आहे. त्या पाऊलखुणा जपण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची झाडेझुडपे काढणे, पडझड झालेल्या वास्तूच्या भिंतीची दुरुस्ती, पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे, पुरातत्त्व संकेतानुसार उत्खनन करणे, किल्ल्याच्या वास्तूचे स्ट्रक्चर करून अहवाल तयार करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात यांनी उदगीर किल्ला राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी सोमवारी ५ कोटींचा निधी मंजूर केल्याचे आदेश जारी केले आहेत.
उदगीरच्या किल्ला दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST