शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

४ लाख ८० हजार मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व ...

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. त्यावर उपाय म्हणून जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जात असून, १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा अडसर या मोहिमेला दिसून येत आहे.

जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये वर्षातून दोनदा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात अंगणवाडी, शाळा व शाळाबाह्य असे एकूण ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना गोळ्या देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात २०११ शाळातील ३ लाख २७ हजार ५१९ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर अंगणवाडीतील १ लाख ४९ हजार ३८२ आणि शाळाबाह्य २ हजार ९३६ मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात १ मार्चपासून जंतनाशक मोहीम राबविली जात असून, शाळा, अंगणवाडीस्तरावर गोळ्या वाटप केल्या जात आहेत. तसेच आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन लहान बालकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीमुळे या मोहिमेला अडसर येत आहे.

घरोघरी जाऊन होणार वाटप

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन १ ते ६ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद असून, उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्हास्तरीय मोहिमेला लातूर तालुक्यातील कातपूर येथून जि.प. उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असून, जिल्ह्यातील दहाही तालुक्यात या उपक्रमाची प्रभावी अंलबजावणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

आरोग्य विभागाच्या वतीने आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रसार रोखण्यासाठी जंतनाशक मोहीम राबविली जाते. ग्रामीणस्तरावर या मोहिमेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, लहान बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. जवळपास ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट जि.प.च्या आरोग्य विभागासमोर आहे.