शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

४ लाख ८० हजार मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व ...

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. त्यावर उपाय म्हणून जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जात असून, १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा अडसर या मोहिमेला दिसून येत आहे.

जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये वर्षातून दोनदा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात अंगणवाडी, शाळा व शाळाबाह्य असे एकूण ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना गोळ्या देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात २०११ शाळातील ३ लाख २७ हजार ५१९ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर अंगणवाडीतील १ लाख ४९ हजार ३८२ आणि शाळाबाह्य २ हजार ९३६ मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात १ मार्चपासून जंतनाशक मोहीम राबविली जात असून, शाळा, अंगणवाडीस्तरावर गोळ्या वाटप केल्या जात आहेत. तसेच आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन लहान बालकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीमुळे या मोहिमेला अडसर येत आहे.

घरोघरी जाऊन होणार वाटप

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन १ ते ६ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद असून, उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्हास्तरीय मोहिमेला लातूर तालुक्यातील कातपूर येथून जि.प. उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असून, जिल्ह्यातील दहाही तालुक्यात या उपक्रमाची प्रभावी अंलबजावणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

आरोग्य विभागाच्या वतीने आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रसार रोखण्यासाठी जंतनाशक मोहीम राबविली जाते. ग्रामीणस्तरावर या मोहिमेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, लहान बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. जवळपास ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट जि.प.च्या आरोग्य विभागासमोर आहे.