शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

४ लाख ८० हजार मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व ...

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. त्यावर उपाय म्हणून जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जात असून, १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा अडसर या मोहिमेला दिसून येत आहे.

जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये वर्षातून दोनदा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात अंगणवाडी, शाळा व शाळाबाह्य असे एकूण ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना गोळ्या देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात २०११ शाळातील ३ लाख २७ हजार ५१९ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर अंगणवाडीतील १ लाख ४९ हजार ३८२ आणि शाळाबाह्य २ हजार ९३६ मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात १ मार्चपासून जंतनाशक मोहीम राबविली जात असून, शाळा, अंगणवाडीस्तरावर गोळ्या वाटप केल्या जात आहेत. तसेच आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन लहान बालकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीमुळे या मोहिमेला अडसर येत आहे.

घरोघरी जाऊन होणार वाटप

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन १ ते ६ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद असून, उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्हास्तरीय मोहिमेला लातूर तालुक्यातील कातपूर येथून जि.प. उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असून, जिल्ह्यातील दहाही तालुक्यात या उपक्रमाची प्रभावी अंलबजावणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

आरोग्य विभागाच्या वतीने आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रसार रोखण्यासाठी जंतनाशक मोहीम राबविली जाते. ग्रामीणस्तरावर या मोहिमेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, लहान बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. जवळपास ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट जि.प.च्या आरोग्य विभागासमोर आहे.