मांजरा धरण यावर्षी शंभर टक्के भरले असून या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे, त्यासंदर्भाने पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाणीसाठा आणि त्यावरील आरक्षण, कालव्याची दुरुस्ती, वीज उपलब्धता व इतर बाबींचा आढावा घेतला. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित नितनवरे म्हणाले, लातूर, उस्मानाबाद, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळता सिंचनासाठी १०८ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. मांजरा धरणातील पाण्यावर लातूर, बीड उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील एकूण १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. कालवा समितीचीही बैठक झाली असून उजव्या आणि डाव्या कालव्यातून १५ जानेवारीपर्यंत पाणी सोडले जाणार असल्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.
‘मांजरा’तील ३२.७३२ दलघमी पिण्यासाठी आरक्षित तर सिंचनासाठी १०८ दलघमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST