शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळामध्ये जिल्ह्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांचा "स्वाध्याय"वर अभ्यास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

लातूर : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून ''स्वाध्याय'' अर्थात डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रम राबविला जात आहे. यासाठी ...

लातूर : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून ''स्वाध्याय'' अर्थात डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रम राबविला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील ४० हजार ५६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३२ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत स्वाध्याय मालिका पूर्ण केली आहे.

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वाध्याय हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन प्रश्न स्वाध्यायमध्ये समाविष्ट करून व्हाॅट्सॲपद्वारे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जात आहेत. या उपक्रमात ४० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी असून, रेणापूर तालुक्यातील ३६१२, उदगीर ९६६१, औसा ६१५८, शिरूर अनंतपाळ १३६५, निलंगा ४३६९, देवणी १०१९, जळकोट ८६३, चाकूर १४००, अहमदपूर २११२, तर लातूर तालुक्यातील ३१०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात स्वाध्याय मालिका पूर्ण केली आहे.

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ४,७९,८२६

स्वाध्याय नोंदणी केलेले विद्यार्थी - ४०,५६९

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी - ३२,६०६

मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम...

कोरोनाच्या काळात अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास व्हावा, यासाठी स्वाध्याय मालिका व्हाॅट्सॲपद्वारे सोडविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू या तीन माध्यमांचा समावेश असून, दर आठवड्याला नवीन प्रश्न दिले जातात. शिक्षण विभागाच्या वतीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

विद्यार्थी म्हणतात...

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षकांनी स्वाध्याय उपक्रमाच्या लिंक ग्रुपवर शेअर केले आहेत. दर आठवड्याला नवीन प्रश्न असल्याने अभ्यासाची उजळणी होत आहे. आतापर्यंत १८ स्वाध्याय पूर्ण झाले असून, सर्व स्वाध्यायमध्ये सहभाग नोंदविला आहे. - विद्यार्थी

प्रत्येक विषयाशी निगडित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे परीक्षेची तयारी होत आहे. शाळेतून या उपक्रमात सहभागी होण्याच्या सूचना असल्याने सर्व मित्र यामध्ये सहभागी आहोत. घरीच प्रश्नमालिका सोडवायला मिळत आहे. - विद्यार्थी

उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी...

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्वाध्याय उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. एकंदरीत जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३२ हजार विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला आहे. - तृप्ती अंधारे, माध्यमिक शिक्षणाधिकरी.

विद्यार्थ्यांसाठी सराव मालिका...

स्वाध्याय उपक्रमामध्ये दर आठवड्याला नवीन प्रश्न उपलब्ध करून दिले जातात. पहिली ते चौथीच्या शाळा बंद असल्याने ऑनलाईनबरोबर स्वाध्याय उपक्रम फायद्याचा ठरत आहे. विद्यार्थ्यांची उपक्रमात उपस्थिती वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. - विशाल दशवंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी.