शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

उमराह (हज) यात्रेच्या नावाखाली २७ जणांची फसवणूक, औरंगाबाद, मुंबईच्या एजंटांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:16 IST

उमराह (हज) यात्रेच्या नावाखाली एकूण २७ जणांना फसविल्याची घटना घडली.

लातूर : उमराह (हज) यात्रेच्या नावाखाली एकूण २७ जणांना फसविल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून औरंगाबाद व मुंबई येथील चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले, शहरातील फिर्यादी कासिम मोहम्मदसाब शेख (६८, रा. खोरी गल्ली, लातूर) हे एस.टी. महामंडळातील सेवानिवृत्त मेकॅनिक आहेत. त्यांनी अल बुराक या ट्रॅव्हल्स कंपनीकडे एजंटामार्फत हज यात्रेसाठी रक्कम भरली होती. २७ जून २०१८ पासून हे १७ मे २०१९ या कालावधीत एकूण २७ यात्रेकरूंनी प्रती ३५ हजार रुपये प्रमाणे ९ लाख ५० हजार रुपये संबंधितांकडे जमा केले होते. या सर्व यात्रेकरूंना आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईहून यात्रेला पाठविण्याचे ठरले होते. यात्रेसाठी जाणाऱ्या एकूण २७ यात्रेकरूंचे जाण्या-येण्याचे तिकीट व मुक्कामासह भोजनाची व्यवस्था करण्यात येणार होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये यात्रेकरूंना यात्रेस पाठविण्यासाठी ११ आॅक्टोबर २०१८ रोजी आपण व्हिसा काढला असता फक्त १३ यात्रेकरूंना १९ आॅक्टोबर २०१८ रोजी मुंबईहून जद्दा येथे पाठविले. जद्दा येथून मुंबईला परत येण्याचे ४ नोव्हेंबर २०१८ रोजी विमानाचे तिकीट दिले होते. राहिलेल्या १४ यात्रेकरूंना पाठवितो म्हणून शेवटपर्यंत पाठविले नाही. १३ यात्रेकरू यात्रेसाठी गेल्यानंतर त्या शहरात नोंदणी केलेल्या हॉटेल मालकाने त्यांना केवळ चार दिवस राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. त्यानंतरची नोंदणी नसल्याने हॉटेलमधून हाकलून देण्यात आले. त्यामुळे यात्रेकरूंना फुटपाथवर राहून दिवस काढावे लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत औरंगाबाद येथील पडेगाव मधील प्रियदर्शिनी कॉलनीत राहणाºया मीर इरशाद अली व मीर जाहेद अली यांनी स्वत:च्या घरी भेटीसाठी आलेल्या यात्रेकरूंना चार दिवसांच्या वाटाघाटीनंतर १४ लोकांचे पैसे परत पाठविल्याबाबतचा धनादेश २० एप्रिल २०१९ रोजी दिला होता. मात्र तो वटला नाही. पुन्हा नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकत्रित रकमेचा धनादेश दिला असता तोही वटला नाही. यातून आपली फसवणूक झाल्याचे यात्रेकरूंच्या लक्षात आले.याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कासिम मोहम्मदसाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीर इरशाद अली, मीर जाहीद अली, अल बुराकचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गु.र.नं. २०६/२०१९ कलम ४२०, ४०६, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.