शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

ट्रान्सफार्मर जळाल्याने उदगीरातील २५ गावे चार दिवसांपासून अंधारात

By हरी मोकाशे | Updated: September 8, 2022 17:57 IST

बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही समस्या

उदगीर (जि. लातूर) : ग्रामीण भागासाठी वीज पुरवठा करण्यासाठीचा १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा एक ट्रान्सफार्मर जळाल्याने चार दिवसांपासून तालुक्यातील २५ गावांसह शहरातील काही भाग अंधारात आहे. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.

तालुक्यातील गावांच्या वीज पुरवठ्यासाठीच्या १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर चार दिवसांपूर्वी जळाला आहे. परिणामी, शेल्हाळ, तोंडचिर, तादलापूर, बेलसकरगा, धोंडीहिप्परगा, शिरोळ, जानापूर, कौळखेड, मलकापूर, माळेवाडी, बनशेळकी, भोपणी, नेत्रगाव, जकनाळ, मादलापूर, मलकापूरसह अन्य वस्ती, तांडे तसेच शहरातील रेल्वे स्टेशन समोरील भाग, समतानगर, गोपाळनगर, संतोषीमाता नगर, दत्त नगर, बनशेळकी रोड, एसटी कॉलनी, बिदर रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या उजवीकडील भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने काही गावांतील जलयोजनाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महावितरण व महापारेषणमधील अधिकाऱ्यांत सुसंवाद नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महावितरणकडे चौकशी केली असता हे काम महापारेषणकडे असल्याचे सांगून हात झटकत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, महापारेषणचे अधिकारी ट्रान्सफार्मर उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगत आहेत.

ट्रान्सफार्मरची जबाबदारी महापारेषणची...महावितरणचे वरिष्ठ अभियंता दराडे म्हणाले, चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मवर वीज पडल्यामुळे तो जळाला. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्याची जबाबदारी महापारेषणची आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

ट्रान्सफार्मर आणण्याची प्रक्रिया सुरु...महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. मरलापल्ले म्हणाले, चार दिवसांपूर्वी ट्रान्सफार्मर जळाला आहे. तो जुना होता. नवीन ट्रान्सफॉर्मर जालन्याहून आणण्याचे काम सुरु आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ट्रान्सफॉर्मर उदगीरात येणे अपेक्षित होते. परंतु पावसामुळे अहमदपूर- उदगीर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची वाहतूक करणे शक्य नसल्याने तो जांब, जळकोटमार्गे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर किमान एक दिवस तरी त्याची पूर्णपणे तपासणी करूनच वीजपुरवठा करावा लागतो. त्यानंतरच महावितरणकडे वीजपुरवठा सुरू होईल. या सर्व बाबी तांत्रिक असल्याने किती वेळ लागेल, हे निश्चित सांगता येत नाही.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण