शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफार्मर जळाल्याने उदगीरातील २५ गावे चार दिवसांपासून अंधारात

By हरी मोकाशे | Updated: September 8, 2022 17:57 IST

बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही समस्या

उदगीर (जि. लातूर) : ग्रामीण भागासाठी वीज पुरवठा करण्यासाठीचा १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा एक ट्रान्सफार्मर जळाल्याने चार दिवसांपासून तालुक्यातील २५ गावांसह शहरातील काही भाग अंधारात आहे. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.

तालुक्यातील गावांच्या वीज पुरवठ्यासाठीच्या १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर चार दिवसांपूर्वी जळाला आहे. परिणामी, शेल्हाळ, तोंडचिर, तादलापूर, बेलसकरगा, धोंडीहिप्परगा, शिरोळ, जानापूर, कौळखेड, मलकापूर, माळेवाडी, बनशेळकी, भोपणी, नेत्रगाव, जकनाळ, मादलापूर, मलकापूरसह अन्य वस्ती, तांडे तसेच शहरातील रेल्वे स्टेशन समोरील भाग, समतानगर, गोपाळनगर, संतोषीमाता नगर, दत्त नगर, बनशेळकी रोड, एसटी कॉलनी, बिदर रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या उजवीकडील भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने काही गावांतील जलयोजनाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महावितरण व महापारेषणमधील अधिकाऱ्यांत सुसंवाद नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महावितरणकडे चौकशी केली असता हे काम महापारेषणकडे असल्याचे सांगून हात झटकत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, महापारेषणचे अधिकारी ट्रान्सफार्मर उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगत आहेत.

ट्रान्सफार्मरची जबाबदारी महापारेषणची...महावितरणचे वरिष्ठ अभियंता दराडे म्हणाले, चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मवर वीज पडल्यामुळे तो जळाला. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्याची जबाबदारी महापारेषणची आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

ट्रान्सफार्मर आणण्याची प्रक्रिया सुरु...महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. मरलापल्ले म्हणाले, चार दिवसांपूर्वी ट्रान्सफार्मर जळाला आहे. तो जुना होता. नवीन ट्रान्सफॉर्मर जालन्याहून आणण्याचे काम सुरु आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ट्रान्सफॉर्मर उदगीरात येणे अपेक्षित होते. परंतु पावसामुळे अहमदपूर- उदगीर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची वाहतूक करणे शक्य नसल्याने तो जांब, जळकोटमार्गे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर किमान एक दिवस तरी त्याची पूर्णपणे तपासणी करूनच वीजपुरवठा करावा लागतो. त्यानंतरच महावितरणकडे वीजपुरवठा सुरू होईल. या सर्व बाबी तांत्रिक असल्याने किती वेळ लागेल, हे निश्चित सांगता येत नाही.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण