शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

२५ अर्ज विकले पण एकही अर्ज दाखल नाही

By admin | Updated: March 27, 2016 00:14 IST

लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़

लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़ नसल्याने महापालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीत फारसा उत्साह नाही़ इच्छुकांनी अर्ज विकत घेतले पण अद्याप एकही अर्ज निवडणूक विभागाकडे आला नाही़ कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दुष्काळाचा विषय पेरण्यात आला़ त्यातच पुन्हा सत्ताधारी काँग्रेसने माघार घेतल्याने निवडणुकीचा रंग फिकट झाला आहे़लातूर शहर दुष्काळाच्या दुष्ट चक्रात सापडलेले असताना पाण्याचा विषय गंभीर बनला आहे़ सर्वत्र एकच मागणी ती म्हणजे पाण्याचीच़ कचऱ्याचाही प्रश्न गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंबित आहे़ रखरखत्या उन्हात घागरभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पोटनिवडणुकीविषयी आस्था उरली नाही़ काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रमसिंह चौहाण यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे़ मागील दीड वर्षांपासून त्यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा होती़ त्यावेळी पक्षांतर्गत इच्छुकांची संख्याही अधिक होती़ आता नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे़ त्यामुळे खर्च करायचा कसा ? त्यात पुन्हा दुष्काऴ केलेला खर्चही निघणे शक्य नसल्याने इच्छुकांची संख्या घटली आहे़ काँगे्रसने माघार घेतल्याने पोटनिवडणुकीची रंगत गेली असली तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू आहे़ शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी या दोघांनीही पोटनिवडणूक लढायचीच असा पण केला आहे़ २९ मार्च अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती अर्ज दाखल होतात आणि त्यातून कितीजण माघार घेतात, यावर निवडणुकीच्या रंगाचा ढंग समोर येणार आहे़ राष्ट्रवादीचे पालिकेतील विरोधी पक्षनेते मकरंद सावे म्हणाले, आम्ही निवडणूक लढणार आहोत, दहा इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत़