शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

२५ अर्ज विकले पण एकही अर्ज दाखल नाही

By admin | Updated: March 27, 2016 00:14 IST

लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़

लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़ नसल्याने महापालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीत फारसा उत्साह नाही़ इच्छुकांनी अर्ज विकत घेतले पण अद्याप एकही अर्ज निवडणूक विभागाकडे आला नाही़ कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दुष्काळाचा विषय पेरण्यात आला़ त्यातच पुन्हा सत्ताधारी काँग्रेसने माघार घेतल्याने निवडणुकीचा रंग फिकट झाला आहे़लातूर शहर दुष्काळाच्या दुष्ट चक्रात सापडलेले असताना पाण्याचा विषय गंभीर बनला आहे़ सर्वत्र एकच मागणी ती म्हणजे पाण्याचीच़ कचऱ्याचाही प्रश्न गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंबित आहे़ रखरखत्या उन्हात घागरभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पोटनिवडणुकीविषयी आस्था उरली नाही़ काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रमसिंह चौहाण यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे़ मागील दीड वर्षांपासून त्यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा होती़ त्यावेळी पक्षांतर्गत इच्छुकांची संख्याही अधिक होती़ आता नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे़ त्यामुळे खर्च करायचा कसा ? त्यात पुन्हा दुष्काऴ केलेला खर्चही निघणे शक्य नसल्याने इच्छुकांची संख्या घटली आहे़ काँगे्रसने माघार घेतल्याने पोटनिवडणुकीची रंगत गेली असली तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू आहे़ शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी या दोघांनीही पोटनिवडणूक लढायचीच असा पण केला आहे़ २९ मार्च अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती अर्ज दाखल होतात आणि त्यातून कितीजण माघार घेतात, यावर निवडणुकीच्या रंगाचा ढंग समोर येणार आहे़ राष्ट्रवादीचे पालिकेतील विरोधी पक्षनेते मकरंद सावे म्हणाले, आम्ही निवडणूक लढणार आहोत, दहा इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत़