शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात २४.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:20 IST

मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. या ...

मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आणि पाणलोट क्षेत्रखालील जमिनीला पाणी मिळण्यासाठी प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत प्रकल्पाची पाणी पातळी ६३८. 3३०मीटर आहे. तर धरणाची एकूण पातळी ६४२.३७ मीटर आहे. निर्धारित पाणी पातळी गाठण्यासाठी मोठा पाऊस हवा आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा ९५.७४०दलघमी आहे. तर धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठ्याची टक्केवारी २७.४७ टक्के आहे.

लातूर शहरासाठी उचलले जाते 40 एमएलडी पाणी...

लातूर शहराला पंचेचाळीस ते पन्नास एम एल डी पाणी लागते. त्यानुसार दररोज एवढ्या पाण्याची उचल मांजरा प्रकल्पातून केली जाते. सरासरी ४५ एम एल डी पाणी उचलून शहराला आठ दिवसाला पुरवठा केला जातो. किमान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाई नंतर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने दोनदा भरले आहे. यावर्षी ऑगस्ट अखेर फक्त चोवीस दलघमी नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसावरच सर्व काही अवलंबून आहे. पिण्यासाठी मुबलक आणि शेतीला जेमतेम पाणी मिळण्यासाठी मोठ्या पावसाकडे लातूरकरांची डोळे लागले आहेत.

प्रकल्प क्षेत्र परिसरात ३९० मिमी पाऊस....

प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ३९० मिमी पाऊस झाला आहे. धरणात नव्याने २४.०२३ झाला आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे.जेणेकरून धरणातील पाण्याची पातळी वाढेल. क्षेत्रात गुरुवारी २.२०४ दलघमी नवीन पाणी आले आहे.