शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

३८ टक्के खातेदार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये २२६ कोटींचे पीकविमा अग्रीम

By हरी मोकाशे | Updated: July 4, 2024 19:44 IST

गतवर्षीचा खरीप : केवळ सव्वातीन लाख अर्जदारांची बोळवण

लातूर : गेल्या वर्षीच्या खरीपात पावसाचा विलंब आणि २१ दिवसांपेक्षा अधिकच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा अग्रीमची आशा होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ ३८ टक्के अर्थात ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. परिणामी, उर्वरित शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्त, राज्य आणि केंद्र शासनाकडे धाव घेत आक्षेप सादर केले होते.

पीक संरक्षणासाठी साडेआठ लाख अर्ज...प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षी ८ लाख ६१ हजार ६७५ अर्ज दाखल झाले होते. ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना २२६ कोटी ४१ लाख ३२ हजार ३५ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

२१ दिवसांच्या खंडाचा ३ लाख अर्जदारांना लाभ...गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्टच्या कालावधीत पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक ताण दिला होता. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, केवळ ३२ मंडळातील ३ लाख ८ हजार ९२४ अर्जदारांना २५ टक्क्यांप्रमाणे २१० कोटी ५८ लाख १३ हजार ८९४ रुपयांची भरपाई मिळाली आहे. अद्यापही उर्वरित ७५ टक्के भरपाई मिळाली नाही.

तीन प्रकारांत मिळाली भरपाई...नैसर्गिक आपत्ती - ११ कोटी ३३ लाखकाढणी पश्चात - ३ कोटी ९५ लाखपावसाचा ताण - २१० कोटी ५८ लाखएकूण - २२६ कोटी ४१ लाख

लातूर तालुक्यास सर्वाधिक पीकविमा...तालुका - विमा वितरणअहमदपूर - २ कोटी ७७ लाखऔसा - ५३ कोटी ७० लाखचाकूर - ३५ कोटी ९२ लाखदेवणी - ६६ लाख ७० हजारजळकोट - ८ कोटी ४१ लाखलातूर - ५९ कोटी ८२ लाखनिलंगा - ४२ कोटी ३४ लाखरेणापूर - ६ कोटी ४८ लाखशिरुर अनं. - ६ कोटी ६५ लाखउदगीर - ९ कोटी ९३ लाखएकूण - २२६ कोटी ४१ लाख

सातत्याने पाठपुरावा...गेल्या वर्षीच्या खरीपात ८ लाख ६१ हजार ६७५ खातेदार शेतकऱ्यांनी ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित केले होते. त्यापैकी ३ लाख २५ हजार ७८६ अर्जदारांना भरपाई देण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने पीकविमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाlaturलातूरFarmerशेतकरी