शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

३८ टक्के खातेदार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये २२६ कोटींचे पीकविमा अग्रीम

By हरी मोकाशे | Updated: July 4, 2024 19:44 IST

गतवर्षीचा खरीप : केवळ सव्वातीन लाख अर्जदारांची बोळवण

लातूर : गेल्या वर्षीच्या खरीपात पावसाचा विलंब आणि २१ दिवसांपेक्षा अधिकच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा अग्रीमची आशा होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ ३८ टक्के अर्थात ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. परिणामी, उर्वरित शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्त, राज्य आणि केंद्र शासनाकडे धाव घेत आक्षेप सादर केले होते.

पीक संरक्षणासाठी साडेआठ लाख अर्ज...प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षी ८ लाख ६१ हजार ६७५ अर्ज दाखल झाले होते. ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना २२६ कोटी ४१ लाख ३२ हजार ३५ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

२१ दिवसांच्या खंडाचा ३ लाख अर्जदारांना लाभ...गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्टच्या कालावधीत पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक ताण दिला होता. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, केवळ ३२ मंडळातील ३ लाख ८ हजार ९२४ अर्जदारांना २५ टक्क्यांप्रमाणे २१० कोटी ५८ लाख १३ हजार ८९४ रुपयांची भरपाई मिळाली आहे. अद्यापही उर्वरित ७५ टक्के भरपाई मिळाली नाही.

तीन प्रकारांत मिळाली भरपाई...नैसर्गिक आपत्ती - ११ कोटी ३३ लाखकाढणी पश्चात - ३ कोटी ९५ लाखपावसाचा ताण - २१० कोटी ५८ लाखएकूण - २२६ कोटी ४१ लाख

लातूर तालुक्यास सर्वाधिक पीकविमा...तालुका - विमा वितरणअहमदपूर - २ कोटी ७७ लाखऔसा - ५३ कोटी ७० लाखचाकूर - ३५ कोटी ९२ लाखदेवणी - ६६ लाख ७० हजारजळकोट - ८ कोटी ४१ लाखलातूर - ५९ कोटी ८२ लाखनिलंगा - ४२ कोटी ३४ लाखरेणापूर - ६ कोटी ४८ लाखशिरुर अनं. - ६ कोटी ६५ लाखउदगीर - ९ कोटी ९३ लाखएकूण - २२६ कोटी ४१ लाख

सातत्याने पाठपुरावा...गेल्या वर्षीच्या खरीपात ८ लाख ६१ हजार ६७५ खातेदार शेतकऱ्यांनी ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित केले होते. त्यापैकी ३ लाख २५ हजार ७८६ अर्जदारांना भरपाई देण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने पीकविमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाlaturलातूरFarmerशेतकरी