शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

जिल्ह्यातील २१ हजार शेतक-यांनी केला ७ कोटींचा वीजबिल भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST

लातूर परिमंडलात बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक, वाणिज्यिक आणि कृषिपंपधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महावितरणच्यावतीने ...

लातूर परिमंडलात बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक, वाणिज्यिक आणि कृषिपंपधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महावितरणच्यावतीने वसुली मोहीम राबविली जात आहे. कृषिपंप धारकांसाठी विविध सवलती दिल्या जात असल्याने अनेकांनी थकीत वीजबिल भरण्याला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार लातूर परिमंडलाच्यावतीने वीजबिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येत असून, नवीन कृषीपंप जोडणी धोरणाअंर्तगत राज्यात ‘महाकृषी ऊर्जापर्व अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जनजागृती केली जात आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याज आणि दंडाच्या रकमेत माफीची सोय असल्याने जिल्ह्यात २१ हजार ९०१ शेतकऱ्यांनी ७ कोटी ३० लाखांचा भरणा केला आहे. यातील ६१० शेतकरी थकबाकीतून मुक्त झाले आहेत. त्यानिमित्त मुख्य अभियंता रवींद्र कोलप यांच्याहस्ते परिमंडल कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक नितीश वाघमारे, शिवराज अंबेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामसे, बी. जी शेंडगे, पी. आर. पुनसे, राजाराम काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जनार्दन कसपटे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी रेड्डी, विकास कांबळे यांची उपस्थिती होती.

महाकृषी ऊर्जापर्वाबाबत मार्गदर्शन...

महावितरणच्यावतीने महाकृषी ऊर्जापर्वाबाबत जनजागृती केली जात आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वीज सुरक्षेबद्दल माहिती दिली जात आहे. त्यानुसार गुरुवारी देशीकेंद्र विद्यालयात ही मेाहीम राबविण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामसे आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.