शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आरटीई सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची झाली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST

लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण ...

लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी लातूर जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. जिल्ह्यात १ हजार ७४० जागा असून, यासाठी ४ हजार २४ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना संदेश पाठवला नव्हता तसेच जिल्हा शिक्षण विभागाकडे यादी पाठविण्यात आली नव्हती. गुरुवारी सायंकाळनंतर यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांची शाळानिहाय निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ९७, औसा ७६, चाकूर ६८, देवणी ३४, जळकोट ५, लातूर ९४५, निलंगा १३५, रेणापूर २७, शिरूर अनंतपाळ १२, तर उदगीर तालुक्यातील २०५ अशा एकूण १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.

तालुकास्तरावर होणार कागदपत्रांची पडताळणी...

आरटीई सोडतमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर असलेल्या पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. शिक्षण विभागाकडे नोंदणी केलेल्या शाळांना प्रवेशाबाबत योग्य त्या सूचना करण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.