शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना 

By आशपाक पठाण | Updated: September 12, 2023 18:23 IST

उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

उदगीर (लातूर) : तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. खिचडी खाल्ल्यावर काही वेळात विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तत्काळ त्या विद्यार्थ्यांना उदगीर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

खिचडी खाल्ल्यावर त्रास झालेल्या १५ पैकी ११ जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर ४ जण दक्षता विभागात उपचार घेत असल्याचे सामान्य रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय महिंद्रकर यांनी सांगितले. तोंडारच्या शाळेत मंगळवारी मध्यान्ह भोजनात तांदूळ व हरभरा याचा वापर करून बनविण्यात आलेली खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी काही जणांनी खिचडी शाळेत खाल्ली तर काहीजण घरी घेऊन गेले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना मळमळी व उलटीचा त्रास सुरू झाला. दरम्यान, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी खिचडीमध्ये आळ्या असल्याच्या व तांदळाला जाळ्या आणि हरभरे हे किडके वापरल्याचा आरोप केला आहे. निकृष्ट धान्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पोटदुखीमुळे विद्यार्थी त्रस्त...रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या काही विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता, त्यामुळे ते विद्यार्थी रडत होते. यावेळी शाळेतील शिक्षिकाही रूग्णालयात उपस्थित होत्या. शाळेच्या कामानिमित्त उदगीरला गेलेले प्रभारी मुख्याध्यापक आर.बी. फड घटनेची माहिती मिळताच शाळेत हजर झाले.

सर्वांची प्रकृती स्थिर : डॉ. महिंद्रकररूग्णालयाच्या दक्षता विभागात अनिकेत जाधव (वय ६), सृष्टी मालोदे (वय ६), रंगनाथ कबाडे (वय १०) आरती गायकवाड (वय ८) यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच रिया गायकवाड (८), पृथ्वीराज चव्हाण (१२), अभिषेक तेलंगे (६), जुनेद शेख (११ ), यश जाधव (१०), नागनाथ गायकवाड (१०), गुरु दाजी (७ ) अनुजा स्वामी (९), अंजली राठोड (९) विजय राठोड ( ७) विजया राठोड (६) यांच्यावर उपचार करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, कुणालाही कोणताही धोका नाही असे सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ.अजय महिंद्रकर यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर