शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

११६ गावांना मिळणार नळाचे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर ...

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर प्रत्येकास शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यातील सहा गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात आला आहे.

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून तालुक्यातील १२२ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ११६ गावांत जल जीवन मिशनअंतर्गत तर ६ गावांत मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व गावांचा सर्व्हे करण्यात आला असून त्याची विभागणी दोन भागांत करण्यात आली आहे. पहिल्या भागात ज्या गावात किरकोळ दुरुस्ती करून अथवा शिल्लक नळजोडणी करून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत बंदिस्त निधीतून व जल जीवन मिशनचा निधी खर्च करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच ज्या गावात अद्याप पाणीपुरवठा योजना नाही अथवा जुनी योजना बंद पडली आहे, ती कार्यान्वित करणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी ७० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अंदाजपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

तालुक्यातील ६ गावांची मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये निवड करण्यात आली असून त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. त्यात देवकरा, दगडवाडी, कोळवाडी, हिंगणगाव या प्रादेशिक योजनांचे काम प्रगतिपथावर असून सावरगाव थोट व तीर्थ या गावांचे काम पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोग व जलजीवन मिशनचा निधी मिळणार आहे. तो केवळ पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व अंदाजपत्रक व माहिती पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या वतीने तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, पेयजल योजनेसंदर्भात अनेक गावांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील थोडगा व बेलूर येथील काम प्रलंबित असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

९ हजार नळ जोडणीचे उद्दिष्ट...

मार्चअखेरपर्यंत सर्वच गावांतील उपलब्ध योजनेनुसार ९ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील ६ हजार ८७८ नळ जोडण्यांचे काम पूर्ण झाले असून जवळपास ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या मार्चअखेर पूर्ण होणार आहे.

कामात अनियमिततेची तक्रार...

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या कामात काही ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. याबाबत उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार दाखल झाली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी थोडगा येथील अमोल पाटील व बेलूरचे प्रशांत पुणे यांनी केली आहे.