शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

११६ गावांना मिळणार नळाचे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर ...

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर प्रत्येकास शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यातील सहा गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात आला आहे.

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून तालुक्यातील १२२ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ११६ गावांत जल जीवन मिशनअंतर्गत तर ६ गावांत मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व गावांचा सर्व्हे करण्यात आला असून त्याची विभागणी दोन भागांत करण्यात आली आहे. पहिल्या भागात ज्या गावात किरकोळ दुरुस्ती करून अथवा शिल्लक नळजोडणी करून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत बंदिस्त निधीतून व जल जीवन मिशनचा निधी खर्च करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच ज्या गावात अद्याप पाणीपुरवठा योजना नाही अथवा जुनी योजना बंद पडली आहे, ती कार्यान्वित करणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी ७० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अंदाजपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

तालुक्यातील ६ गावांची मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये निवड करण्यात आली असून त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. त्यात देवकरा, दगडवाडी, कोळवाडी, हिंगणगाव या प्रादेशिक योजनांचे काम प्रगतिपथावर असून सावरगाव थोट व तीर्थ या गावांचे काम पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोग व जलजीवन मिशनचा निधी मिळणार आहे. तो केवळ पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व अंदाजपत्रक व माहिती पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या वतीने तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, पेयजल योजनेसंदर्भात अनेक गावांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील थोडगा व बेलूर येथील काम प्रलंबित असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

९ हजार नळ जोडणीचे उद्दिष्ट...

मार्चअखेरपर्यंत सर्वच गावांतील उपलब्ध योजनेनुसार ९ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील ६ हजार ८७८ नळ जोडण्यांचे काम पूर्ण झाले असून जवळपास ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या मार्चअखेर पूर्ण होणार आहे.

कामात अनियमिततेची तक्रार...

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या कामात काही ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. याबाबत उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार दाखल झाली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी थोडगा येथील अमोल पाटील व बेलूरचे प्रशांत पुणे यांनी केली आहे.