शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

११६ गावांना मिळणार नळाचे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर ...

अहमदपूर : तालुक्‍यातील १२२ पैकी ११६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मार्च २०२४ अखेर प्रत्येकास शुद्ध पाणी मिळणार आहे. त्यातील सहा गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात आला आहे.

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून तालुक्यातील १२२ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ११६ गावांत जल जीवन मिशनअंतर्गत तर ६ गावांत मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व गावांचा सर्व्हे करण्यात आला असून त्याची विभागणी दोन भागांत करण्यात आली आहे. पहिल्या भागात ज्या गावात किरकोळ दुरुस्ती करून अथवा शिल्लक नळजोडणी करून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगांतर्गत बंदिस्त निधीतून व जल जीवन मिशनचा निधी खर्च करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच ज्या गावात अद्याप पाणीपुरवठा योजना नाही अथवा जुनी योजना बंद पडली आहे, ती कार्यान्वित करणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी ७० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अंदाजपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

तालुक्यातील ६ गावांची मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये निवड करण्यात आली असून त्याचे काम पूर्णत्वास जात आहे. त्यात देवकरा, दगडवाडी, कोळवाडी, हिंगणगाव या प्रादेशिक योजनांचे काम प्रगतिपथावर असून सावरगाव थोट व तीर्थ या गावांचे काम पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोग व जलजीवन मिशनचा निधी मिळणार आहे. तो केवळ पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व अंदाजपत्रक व माहिती पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या वतीने तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, पेयजल योजनेसंदर्भात अनेक गावांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील थोडगा व बेलूर येथील काम प्रलंबित असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

९ हजार नळ जोडणीचे उद्दिष्ट...

मार्चअखेरपर्यंत सर्वच गावांतील उपलब्ध योजनेनुसार ९ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील ६ हजार ८७८ नळ जोडण्यांचे काम पूर्ण झाले असून जवळपास ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या मार्चअखेर पूर्ण होणार आहे.

कामात अनियमिततेची तक्रार...

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या कामात काही ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. याबाबत उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार दाखल झाली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी थोडगा येथील अमोल पाटील व बेलूरचे प्रशांत पुणे यांनी केली आहे.