शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

लातूर जिल्ह्यात तीन महिन्यांत ११२ व्यक्तींना सर्पदंश; तत्काळ उपचार मिळाल्याने अनर्थ टळला

By हणमंत गायकवाड | Updated: July 28, 2023 18:45 IST

सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे.

लातूर : जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये ५५४ व्यक्तींना सर्पदंश झाला असून या सर्वच व्यक्तींना रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार भेटल्याने अनर्थ टळला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात सर्वाधिक ११२ जणांना सर्पदंश झाला आहे. विशेष करून या तीन महिन्यांमध्येच साप बाहेर येण्याचे प्रमाण अधिकचे असते. त्यामुळेच माणसांच्या संपर्कात येऊन ते चावण्याच्या घटना घडतात.

सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी मुबलक साठा उपलब्ध केला आहे. विषारी साप चावल्यानंतर कुठल्या औषध लागते. त्या सर्व औषधांचा साठा रुग्णालयाने उपलब्ध करून ठेवला आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सर्पदंशावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जून, जुलै महिन्यामध्ये तसेच खरीप पीक काढणीच्या वेळी सर्पदंश होण्याच्या घटना वाढत असतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने औषधांची वाढीव मागणी केली आहे, जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले. सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला, त्याला धीर देऊन तत्काळ दवाखाना गाठायला हवा. गैरसमज जास्त असल्याने भीतीमुळेच धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे तत्काळ उपचार घ्यावे.

सर्पदंश झाल्यानंतर काय करायला हवे... मोकळा स्वच्छ जागेत हलवावे.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा, पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे,विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे, विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने बांधून आवळून घ्यावे. आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट चाकून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे, दर १५ ते २० मिनिटांनंतर १५  सेकंदांसाठी सोडावा व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावा, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते,दवाखान्यात जातांना शक्यतो फोनवर डॉक्टरांना कळवावे. तत्काळ मदत करता येईल, दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा ॲलर्जी अथवा एकादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.

सुरक्षित जागेच्या शोधात असतात साप... पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन- ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता.या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी. घाबरून न जाता समोरे जायाला हवे, सर्प मित्रांनी सांगितले. प्रजनन काळ आणि पाऊस एकदाच येत असल्याने बाहेर साप पडतात. यावेळी सर्पदंश होऊ शकतो.

टॅग्स :snakeसापlaturलातूर